मंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. आज मनोज जरांगे पाटलांची पायी यात्रा पुण्यातून लोणावळ्याकडे जात आहे. येत्या २६ जानेवारी रोजी भगवा वादळ मुंबईत धडकणार आहेत. परंतु त्याआधी कोर्टाने मनोज जरांगे पाटलांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे मराठा मोर्चा आता पुण्यातूनच माघारी फिरणार का ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा…राम मंदिर सोहळ्याच्या व्यासपीठावर शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास, मोदींच्या समोरच महाराजांचा अपमान
येत्या २६ जानेवारी रोजी मराठा वादळ मुंबईत धडकणार असून आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कवर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू करणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वकिल गुणरत्ने सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली असून मनोज जरांगे पाटील यांच्यासह मुंबई पोलिस यांना कोर्टाने नोटीस बजावली आहे.
हेही वाचा…राम मंदिराच्या सोहळ्यापुर्वी दोन गटात मोठा राडा, श्रीरामाचे झेंडे असलेल्या गाड्या फोडल्या, गृहमंत्रालय अॅक्शन मोडवर
दरम्यान, मराठा आंदोलक मुंबईत आल्यास पोलीस आणि राज्य शासन कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार याची माहिती देण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. त्याचबरोबर आझाद मैदान पोलिसांनाही नोटीस बजावली असून जर लाखोंच्या संख्येने लोक आले तर काय व्यवस्था करण्यात आली आहे. तुमचं नेमकं नियोजन काय? मुंबईतील मराठा आंदोलनामुळे येथील जनजीवन विस्कळीत होणार नाही ही जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे कोर्टाने म्हटले आङे. हजारो बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि लाखो लोकं शहरात आल्यास काय करायचं ही जबाबदारी राज्य सरकारची आहे.
READ ALSO :
हेही वाचा…इंडिया आघाडीत सर्वात मोठी फुट ; ममता बॅनर्जींनंतर ‘या’ मुख्यमंत्र्यांनी देखील दिला स्वबळाचा नारा
हेही वाचा…कॉंग्रेसचा ‘हा’ बडा नेता भाजपमध्ये दाखल, खासदार रक्षा खडसे यांना मोठा धक्का, उमेदवारी जाणार?
हेही वाचा…निवडणुकीच्या तोंडावर भाजपची अयोध्यावारी, मुख्यमंत्र्यांसह अख्ख मंत्रिमंडळ ‘या’ दिवशी अयोध्येला जाणार
हेही वाचा…शिंदे गटाला दापोलीत बसला मोठा हादरा, बडा नेता ठाकरे गटात दाखल
हेही वाचा…‘जय सियाराम’चा नारा…मंगलमय पिंपरी-चिंचवड…अन् पाच लाखाहून अधिक रामभक्तांची रथयात्रा!