मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटलांना पुण्यात मोठा प्रतिसाद मिळाला. पुण्यात ठरलेल्या नियोजनानुसार तब्बल १२ ते १४ तास उशीर झाल्याने पहाटे आज उशिरा लोणावळ्यात जरांगे पाटलांच्या ताफ्यांचा मुक्काम झाला. त्यानंतर आता पुढचा मुक्काम वाशीत होणार असून या दरम्यान मुंबईकडे निघालेल्या आंदोलनाचा मार्ग बदलण्यात आला असून या मार्गावर आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा…डॉ. उल्हास पाटील अन् केतकी पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश, रावेर लोकसभेची चुरस वाढली
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करत असताना नवीन मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. एक्सप्रेस महामार्गावर सीआरपीएफ जवानांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मराठा आंदोलक एक्सप्रेस हायवेवर चढू नये बंदोबस्त लावला आहे. त्यामुळे लोणावळ्यातून पनवेलकडे येतानाचा मार्ग पोलिसांनी बदलला आहे. आंदोलकांना पुणे मुंबई मार्गावर जुन्या घाटातून जाण्याच्या पोलिसांनी सूचना केल्या आहेत. परंतु आंदोलक नवीन मार्गावरून जाण्याचा भूमिकेवर ठाम राहिले आहेत.
हेही वाचा…मुंबईत येण्याआधी मनोज जरांगे पाटलांना कोर्टाची नोटीस, दोन आठवड्यांचा दिला वेळ, मराठा आंदोलक माघारी फिरणार का ?
दरम्यान, मनोज जरांगे पाटलांसोबत आलेला मराठा वादळ आज मुंबईच्या वेशीवर धडक मारणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत जड वाहतूक बंद करण्यात आली असून मुंबईत देखील पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर येत्या २६ जानेवारीला मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आपला उपोषण सुरू करणार आहे. यावेळी लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल होणार असून आझाद मैदान पोलिसांना या आंदोलनाचं व्यवस्थित नियोजन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…रोहित पवारांसाठी शरद पवार तब्बल ११ तास बसून राहिले, अन् दुसरीकडे अजित पवार गटाला मिरच्या झोंबल्या
हेही वाचा…ईडीच्या चौकशीनंतर तब्बल ११ तासानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
हेही वाचा…“निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येतील, तसतसा आघाडीतल्या काडीमोडांना ऊत येईल”
हेही वाचा…“भाजपचं आवाहन आम्ही मोडून काढू”, रोहिणी खडसेंनी भाजपच्या विरोधात पुकारला एल्गार
हेही वाचा…मोठी बातमी…..! “मराठा समाजाचा मुंबईतील आंदोलनाचा मार्ग मोकळा”