लोणावळा : मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी यावरून राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी यावं आणि मराठा आरक्षणावर तोडगा काढावा. तिघापैकी एकाने येऊन तोडगा काढला तर आम्ही माघारी जाऊ, असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितले आहे. तर माझी सकाळी झोपतच सही घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
हेही वाचा…आझाद मैदानावरील पोलिसांनी परवानगी नाकारली, जरांगे पाटलांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
सकाळी कुणीतरी अधिकारी आला आणि त्याने मला कोर्टाचा कागद असल्याचं सांगत माझी सही घेतली. आम्ही कोर्टाचा मान सन्मान ठेवतो, त्यामुळे मी लगेच सही केली. त्यात एक मराठा कागद होता आणि एक इंग्रजी कागद होता. पण सकाळी मोर्चाची गडबड असताना, मी झोपेत असताना माझी सही घेतली. माझ्यासह यात इतर नऊ जण असल्याचं सांगत त्यांनी सही घेतली. असे जरांगे पाटील म्हणाले.
हेही वाचा…“सत्ता आल्यास १ महिन्यात आरक्षण देणार, फडणवीसांची ती राणा भीमदेवी थाटात केलेली गर्जना कुठे गेली?”
दरम्यान, लोणावळ्यातून जरांगे पाटील वाशीकडे निघाले असता. त्यांना आंदोलनाचा मार्ग बदलण्यास सांगितले. रस्त्यावर मोठी रूग्णालये असून या मार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशी विनंती पोलिसांनी केली. त्यावर मला इथले रस्ते माहिती नाही. त्याची जबाबदारी ही स्थानिक कार्यकर्त्यांवर सोपवली असून कार्यकर्ते आणि पोलीस सांगतील तसं मी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आज मुक्काम वाशीला असणार आणि उद्या आम्ही मुंबईतील आझाद मैदानावर जाणार. असंही त्यांनी म्हटले.
READ ALSO :
हेही वाचा…“तिघांपैकी एकाने यावं, अन् तोडगा काढावं, लगेच माघारी फिरतो,” जरांगे पाटलांची भूमिका
हेही वाचा…मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर..! “२६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करण्याचा भुजबळांचा मान डावलला”
हेही वाचा“….हलगी आणि ढोलताशाच्या तालावर मराठा समाजातील समर्थकांचा ठेका, मराठा वादळ मुंबईच्या दिशेने रवाना
हेही वाचामुहूर्त शोधला..! महाविकास आघाडीतील दोन बडे नेते भाजपात प्रवेश करणार ?
हेही वाचा…“..तरच आम्ही जागा वाटपाच्या बैठकीला येऊ,” महाविकास आघाडीने दिलेले निमंत्रण वंचितने नाकारले