मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक जण पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. यातच ३० वर्षापेक्षा अधिक काळ कॉंग्रेसमध्ये असलेले तसेच माजी खासदार उल्हास पाटील यांनी भाजपने प्रवेश केला आहे. मुंबईत पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, आणि आशिष देशमुख उपस्थित होते. यातच आता आणखी महाविकास आघाडीतील नेते भाजपमध्ये येणार असल्याचा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे.
हेही वाचा…कुख्यात गुंड गजा मारणे पार्थ पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
महाविकास आघाडीतील दोन बडे नेते लवकरच भाजपात प्रवेश करतील, असा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे. तकसेच काही दिवस वाट पाहा, मुहूर्त शोधला गेला आहे. विकसित भारताची संकल्पना साकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपात येण्यासाठी हे इच्छूक आहेत. असे देखील आशिष देशमुख यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…मीरा रोडवर दोन गटात दगडफेक, विरोधीपक्षनेते सरकारवर संतापले, म्हणाले, की,..
रावेर लोकसभा मतदारसंघातून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी उल्हास पाटील यांची कन्या केतकी पाटील इच्छूक आहेत. त्यामुळेच त्यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. पक्ष प्रवेश केल्यानंतर केतकी पाटील यांना भाजपने भारतीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे आगामी निवडणुकीत विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचा पत्ता कट करून केतकी पाटील यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“..तरच आम्ही जागा वाटपाच्या बैठकीला येऊ,” महाविकास आघाडीने दिलेले निमंत्रण वंचितने नाकारले
हेही वाचा…आझाद मैदानावरील पोलिसांनी परवानगी नाकारली, जरांगे पाटलांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
हेही वाचा…“सत्ता आल्यास १ महिन्यात आरक्षण देणार, फडणवीसांची ती राणा भीमदेवी थाटात केलेली गर्जना कुठे गेली?”
हेही वाचा“….मराठा आरक्षणावर लोणावळ्यातच तोडगा निघणार ? थोड्याच वेळात मुख्यमंत्री जरांगेंशी चर्चा करणार
हेही वाचा…लोकसभा जागावाटपासाठी आघाडीची बैठक, वंचितला निमंत्रण, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार ?