मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंचा जत्था घेऊन राजधानी मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरी देखील आम्ही मुंबईत जाणार अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. आज लोणावळ्यात मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा पार पडल्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेली जरांगे पाटलांची चर्चा निष्फळ ठरली असून जरांगे पाटलांच्या मोर्चाचा ताफा आता मुंबईच्या दिशेने निघाला आहे.
हेही वाचा…अजितदादांचा आज पुन्हा शिरूर दौरा, अमोल कोल्हेंच्या अडचणी वाढल्या, म्हणाले…
मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार आहेत.परंतु या मैदानावर आंदोलन कर्त्यांची क्षमता पाहता मैदान कमी पडू शकतो. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदानाचे ७००० स्क्वेअर मीटर क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आले असून त्याची क्षमता ५००० ते ६००० आंदोलकांना समावून घेण्याएवढीच आहे. परंतु तेथे प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानावर पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही. सोयी सुविधा देखील तेथे नाहीत. असं म्हणत पोलिसांनी मुंबईतील खारघर येथील सेक्टर २९ मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलं आहे.
हेही वाचा“….तर ओबीसी आरक्षण टिकवणं कठीण जाईल”, प्रकाश आंबेडकरांनी दिला सुचक इशारा
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून जरांगे पाटलांनी मुंबईत येऊ नये, अशी मागणी करण्यासाठी शिष्टमंडळ लोणावळ्यात दाखल झाले.परंतु शिष्टमंडळासोबतची झालेली बैठक निष्फळ ठरली असून जरांगे पाटील मुंबईत येण्यावर ठाम आहेत. यातच मराठा वादळ मुंबईत आल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून उद्या २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे उद्या काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सत्ता आल्यास १ महिन्यात आरक्षण देणार, फडणवीसांची ती राणा भीमदेवी थाटात केलेली गर्जना कुठे गेली?”
हेही वाचा“….मराठा आरक्षणावर लोणावळ्यातच तोडगा निघणार ? थोड्याच वेळात मुख्यमंत्री जरांगेंशी चर्चा करणार
हेही वाचा…लोकसभा जागावाटपासाठी आघाडीची बैठक, वंचितला निमंत्रण, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार ?
हेही वाचा…कुख्यात गुंड गजा मारणे पार्थ पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…मीरा रोडवर दोन गटात दगडफेक, विरोधीपक्षनेते सरकारवर संतापले, म्हणाले, की,..