पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच आता अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष ठेवलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून याठिकाणी विविध कामांचं भूमिपुजन करणार आहेत. यातच आज होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला देखील अजित पवार उपस्थितीत लावणार आहेत.
कर्जत येथील मेळाव्यात शिरूरचा आमचा उमेदवार निवडून आणणारच असं जाहीर आवाहन अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना दिला होता. त्यानंतर अजित पवार सातत्याने शिरूर लोकसभा मतदारसंघावर येत आहेत. आज शिरूरमध्ये आले असता कार्यकर्त्यांनी अजित पवारांचं जोरदार स्वागत केले. तर कार्यकर्त्यांनी यावेळी देखील मोठ्या आवाजात घोषणा दिल्या. तर आज शेतकरी मेळाव्याला देखील अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत.
हेही वाचा…“भाजपचं आवाहन आम्ही मोडून काढू”, रोहिणी खडसेंनी भाजपच्या विरोधात पुकारला एल्गार
दरम्यान, अजित पवारांच्या हातून विकासकामं होत आहेत. ते माझ्यासाठी चांगलचं आहे. शेतकरी आक्रोश मोर्चातील अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे या मागण्यांबाबत शेतकरी मेळाव्यातून अजितदादांकडून अपेक्षा आहेत. अजित पवार गटाचा यावेळी शक्तिप्रदर्शन देखील होत आहे. त्यावर तो त्यांचा अधिकार आहे. त्यावर आक्षेप घेणे योग्य नसल्याचं खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले.
हेही वाचा…मोठी बातमी…..! “मराठा समाजाचा मुंबईतील आंदोलनाचा मार्ग मोकळा”
सध्या शिरूरमध्ये मी विद्यमान खासदार आहे. त्यामुळे २०२४ साठी कोण उमेदवार असणार ? हा प्रश्न नाहीय. परंतु कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राजकीय संधी दिली आहे. त्यामुळे पहिल्याच वेळी तीन वेळा संसद रत्न पुरस्कार देखील मला मिळाला आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करत आहे. असेही ते म्हणाले. पुढच्या निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून तुम्हाला संधी दिली जाईल का ? त्यावर नक्कीच काम तर सुरू आहे. संधी दिली जाईल यापेक्षा नक्कीच मी उमेदवार आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
READ ALSO :
हेही वाचा“….तर ओबीसी आरक्षण टिकवणं कठीण जाईल”, प्रकाश आंबेडकरांनी दिला सुचक इशारा
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मार्ग बदलला, ‘या’ मार्गावरून मराठे मुंबईत धडक मारणार
हेही वाचा…रोहित पवारांसाठी शरद पवार तब्बल ११ तास बसून राहिले, अन् दुसरीकडे अजित पवार गटाला मिरच्या झोंबल्या
हेही वाचा…ईडीच्या चौकशीनंतर तब्बल ११ तासानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
हेही वाचा…“निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येतील, तसतसा आघाडीतल्या काडीमोडांना ऊत येईल”