मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आज महाविकास आघाडीची हॉटेल ट्रायडंट, नरिमन पॉईट मुंबई याठिकाणी बैठक पार पडत आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता असून जागा वाटप केल्या जाणार आहेत. अशी माहिती समोर येत आहे. परंतु यातच आता महाविकास आघाडीकडून वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना देखील या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आता वंचितचा समावेश केला जाणार का ? तसेच लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉम्युला ठरणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…रोहित पवारांसाठी शरद पवार तब्बल ११ तास बसून राहिले, अन् दुसरीकडे अजित पवार गटाला मिरच्या झोंबल्या
मागील कित्येक दिवसापासून वंचित महाविकास आघाडीसोबत युती करण्यास आतूर आहे. वंचितला सोबत घेण्यास महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी सकारात्मक भूमिका मांडली होती. परंतु वंचितला महाविकास आघाडीत घेण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यातच आता मुंबईत होत असलेल्या बैठकीसाठी महाविकास आघाडीकडून वंचितला निमंत्रण देण्यात आले असून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वत: प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहिले आहे.
हेही वाचा…ईडीच्या चौकशीनंतर तब्बल ११ तासानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
दरम्यान, नाना पटोले यांनी आंबेडकरांना पाठवलेल्या पत्रात असं म्हटलंय की, देश अत्यंत कठीण कालखंडातून जात आहे. आपण स्वतः महाराष्ट्रासह देशभरात सध्याच्या हुकूमशाही विरोधात खंबीरपणे आवाज उठवीत आहात. देश व संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र येऊन हुकूमशाही विरूध्द लढा देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा करीत आहेत. वंचित बहुजन आघाडी राज्यातील महत्त्वाचा घटक असून दिनांक २५ जानेवारी रोजी होणाऱ्या चर्चेत ‘वंचित’ आघाडीने सहभागी व्हावे, अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे. कृपया ‘वंचित’तर्फे महत्त्वाचे नेते आपण आजच्या बैठकीसाठी पाठवावे ही विनंती.
आदरणीय @Prksh_Ambedkar जी pic.twitter.com/1jG74Ro2o1
— Nana Patole (@NANA_PATOLE) January 25, 2024
READ ALSO :
हेही वाचा…कुख्यात गुंड गजा मारणे पार्थ पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…मीरा रोडवर दोन गटात दगडफेक, विरोधीपक्षनेते सरकारवर संतापले, म्हणाले, की,..
हेही वाचा…अजितदादांचा आज पुन्हा शिरूर दौरा, अमोल कोल्हेंच्या अडचणी वाढल्या, म्हणाले…
हेही वाचा“….तर ओबीसी आरक्षण टिकवणं कठीण जाईल”, प्रकाश आंबेडकरांनी दिला सुचक इशारा
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मार्ग बदलला, ‘या’ मार्गावरून मराठे मुंबईत धडक मारणार