ठाणे : प्रभू रामलल्ला प्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त निघालेल्या मीरा रोडवर मिरवणूकीवर एका जमावाने दगडफेक केली होती. त्यानंतर ठाणे शहरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी विरोधकांनी राज्य सरकावर सडकून टिका केल्यानंतर गृहमंत्र्यांनी मीरा रोडवरील आरोपींवर धडक कारवाई सुरू केली. या प्रकरणी आतापर्यंत १३ जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. परंतु आता याच परिसरात मीरा भाईंदर महापालिकेने अतिक्रमण केलेल्या दुकानांवर बुलडोझर कारवाई केल्याने याची एकच चर्चा सध्या सुरू आहे. तर या घटनेवरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…“निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येतील, तसतसा आघाडीतल्या काडीमोडांना ऊत येईल”
नयानगर येथील समाजकंटकांनी केलीली दगडफेक पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारी नाही. महाराष्ट्रातील सौहार्दाहचे वातावरण बिघडवणाऱ्या सरकारचे हे अपयश आहे. असं म्हणत दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या घटनेचा निषेध करतो असे विजय वडेट्टीवारांनी म्हटले. तर अयोध्या येथील राम मंदिरात प्रभू रामचंद्र यांच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर मीरा रोड येथील नयानगर या ठिकाणी दोन समाजात झालेल्या दगडफेकीची घटना गंभीर आहे. अश्या वेळी लोकप्रतिनिधींनी शांततेचे आवाहन करण्याची आवश्यकता असताना सत्ताधारी पक्षातील आमदाराने सोशल मीडियाच्या माध्यमातून चिथावणीखोर वक्तव्य केली. असं म्हणत त्यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
हेही वाचा…“भाजपचं आवाहन आम्ही मोडून काढू”, रोहिणी खडसेंनी भाजपच्या विरोधात पुकारला एल्गार
दरम्यान, इतकेच नाही तर मीरा रोड इथे जाऊन दहशत निर्माण केली. यामुळे तणाव निर्माण झाला. याला सरकार जबाबदार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारवर असताना सत्ताधारी आमदार जर जातीय दंगलीला चिथावणी देत असेल, तर हे योग्य नाही. सत्ताधारी आमदाराची ही वर्तणूक कायदाविरोधी आहे. सरकारचे अशा लोकप्रतिनिधींना अभय आहे का? महाराष्ट्रात सर्व समाज गुण्या-गोविंदाने राहत असताना या समजात फूट पाडण्याचे कारस्थान का सुरू आहे ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
लोकप्रतिनिधींनी समाजात सौहार्दाचे वातावरण ठेवले पाहिजे. पण महाराष्ट्रातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी समजात तेढ निर्माण करत आहेत. ही बाब निषेधार्ह आहे. सरकारने तात्काळ याची दखल घ्यावी आणि आपल्या पक्षातील आमदार आणि नेत्यांना ताकीद द्यावी.असेही त्यांनी सांगितले.
नयानगर येथील समाजकंटकांनी केलीली दगडफेक पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारी नाही. महाराष्ट्रातील सौहार्दाहचे वातावरण बिघडवणाऱ्या सरकारचे हे अपयश आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या घटनेचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध करतो.
अयोध्या येथील राम मंदिरात प्रभू रामचंद्र यांच्या प्राण…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 24, 2024
READ ALSO :
हेही वाचा…अजितदादांचा आज पुन्हा शिरूर दौरा, अमोल कोल्हेंच्या अडचणी वाढल्या, म्हणाले…
हेही वाचा“….तर ओबीसी आरक्षण टिकवणं कठीण जाईल”, प्रकाश आंबेडकरांनी दिला सुचक इशारा
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मार्ग बदलला, ‘या’ मार्गावरून मराठे मुंबईत धडक मारणार
हेही वाचा…रोहित पवारांसाठी शरद पवार तब्बल ११ तास बसून राहिले, अन् दुसरीकडे अजित पवार गटाला मिरच्या झोंबल्या
हेही वाचा…ईडीच्या चौकशीनंतर तब्बल ११ तासानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….