लोणावळा : मनोज जरांगे पाटील यांचा पायी मोर्चा आता लोणावळ्यात पोहचला आहे. लोणावळ्यात थोड्या वेळाआधी जरांगे पाटलांची जाहीर सभा पार पडली. मुंबईत दाखल झाल्यानंतर मराठा समाजाने काय काय करावे, ? कोणती काळजी घ्यावी? याबाबत मनोज जरांगे पाटलांनी आंदोलकांना काही सूचना केल्या आहेत. तर जरांगे पाटलांनी आपला मोर्चा लोणावळ्यातच थांबवावा, अशी विनंती राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात लोणावळ्यात जरांगे पाटलांशी संवाद साधणार आहे.
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मार्ग बदलला, ‘या’ मार्गावरून मराठे मुंबईत धडक मारणार
काल लाखोंच्या संख्येने मराठा समाजाने पुण्यातून लोणावळ्याकडे कुच केली. तब्बल १४ ते १५ लाख लोकांनी पुण्यात एकत्रित येत जरांगे पाटलांना पाठिंबा दिला. तर आज हा मोर्चा मुंबईच्या वेशीवर पोहचला असून मुंबईत दाखल होण्याच्या आधीच सरकारचं शिष्टमंडळ लोणावळ्यात दाखल झालं आहे. एका बंद खोलीमध्ये जरांगे पाटलांची चर्चा होणार आहे. सरकारच्या या शिष्टमंडळामध्ये जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांचा यामध्ये समावेश असणार आहे.
हेही वाचा…रोहित पवारांसाठी शरद पवार तब्बल ११ तास बसून राहिले, अन् दुसरीकडे अजित पवार गटाला मिरच्या झोंबल्या
यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील दरे गावात असून जरांगे पाटील यांच्या संपुर्ण आंदोलनाबाबत माहिती घेत आहेत. गरज पडल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत : जरांगे पाटील यांच्याशी वीसीद्वारे संवाद साधणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर जरांगे पाटील काय निर्णय घेणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभा जागावाटपासाठी आघाडीची बैठक, वंचितला निमंत्रण, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार ?
हेही वाचा…कुख्यात गुंड गजा मारणे पार्थ पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…मीरा रोडवर दोन गटात दगडफेक, विरोधीपक्षनेते सरकारवर संतापले, म्हणाले, की,..
हेही वाचा…अजितदादांचा आज पुन्हा शिरूर दौरा, अमोल कोल्हेंच्या अडचणी वाढल्या, म्हणाले…
हेही वाचा“….तर ओबीसी आरक्षण टिकवणं कठीण जाईल”, प्रकाश आंबेडकरांनी दिला सुचक इशारा