मुंबई : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीतून निघालेला मोर्चा उद्या २६ जानेवारी रोजी आझाद मैदानावर धडकणार आहे. आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषण सुरू करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यभरातून मुंबईत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मुलबूत सुविधा देण्यात याव्या, तसेच कोणालाही कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली.
हेही वाचा…“..तरच आम्ही जागा वाटपाच्या बैठकीला येऊ,” महाविकास आघाडीने दिलेले निमंत्रण वंचितने नाकारले
रोहित पवार यांनी यासंदर्भात एक निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, मराठा आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभरातून लाखोंच्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते मुंबई शहरात शांततेच्या मार्गाने दाखल होत आहेत. यात महिला, लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या सर्व स्वाभिमानी सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली राहण्याची, जेवणाची व्यवस्था स्वतःच केली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांची लाखोंची संख्या बघता आंदोलनस्थळी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य व्यवस्था, सुरक्षा यासारख्या बाबींसाठी अनेक सामाजिक संघटना देखील स्वयंस्फूर्तीने सहकार्य करतच आहेत, तरी याकामी शासकीय यंत्रणाचे सहकार्य देखील आवश्यक आहे.
हेही वाचा…आझाद मैदानावरील पोलिसांनी परवानगी नाकारली, जरांगे पाटलांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
हे सर्व सामजिक कार्यकर्ते आपल्या न्याय्य मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असल्याने त्यांना शासनानेही सहकार्य करणे अपेक्षित आहे.वरून कितीही राजकीय दबाव असला तरी सर्व राजकीय आदेश धुडकावून महाराष्ट्र धर्म निभावत आपण व आपले सर्व अधिकारी, कर्मचारीया सर्व सामाजिक कार्यकत्यांना सहकार्य केल्याशिवाय राहणार नाहीत, ही अपेक्षा आहे. तरी आपण आपल्या अखत्यारीतील शासकीय यंत्रणेला या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याच्या सूचना ट्याव्यात. अशी विनंती देखील रोहित पवारांकडून करण्यात आली आहे.
यावेळी माजी आमदार चंद्रकांत जी दानवे, सुधाकर दानवे, रविकांत वरपे, पंकज नाना बोराडे, नितीन देशमुख, लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेट्टे, बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेंनजित दादा पाटील, पंकज मोहोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मराठा आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून मुंबईत येत असलेले सामाजिक कार्यकर्ते स्वतःची काळजी घेण्यास सक्षम आहेत. तरीही त्यांना प्रशासनाने पाणी, स्वच्छता, आरोग्य या किमान प्राथमिक सुविधा पुरवणं आवश्यक आहे. या सामाजिक कार्यकर्त्यांना… pic.twitter.com/tmem8u6b5S
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 25, 2024
READ ALSO :
हेही वाचा…सकाळी झोपतच घेतली माझी सही, जरांगे पाटलांचा गंभीर आरोप, मनोज जरांगे पाटलांची मोठी फसवणूक ?
हेही वाचा…“तिघांपैकी एकाने यावं, अन् तोडगा काढावं, लगेच माघारी फिरतो,” जरांगे पाटलांची भूमिका
हेही वाचा…मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर..! “२६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करण्याचा भुजबळांचा मान डावलला”
हेही वाचा“….हलगी आणि ढोलताशाच्या तालावर मराठा समाजातील समर्थकांचा ठेका, मराठा वादळ मुंबईच्या दिशेने रवाना
हेही वाचामुहूर्त शोधला..! महाविकास आघाडीतील दोन बडे नेते भाजपात प्रवेश करणार ?