मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी काल महाविकास आघाडीची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या बैठकीसाठी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना पत्र पाठवून बैठकीचे आमंत्रण दिले होते. परंतु नाना पटोले यांना निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार नाहीत. त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्या सहीचे पत्र पाठवावे, असे म्हणत आंबेडकरांनी बैठकीला न येण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी एक फोन केला अन् वंचित बैठकीसाठी हजर झाला.
हेही वाचा“….हलगी आणि ढोलताशाच्या तालावर मराठा समाजातील समर्थकांचा ठेका, मराठा वादळ मुंबईच्या दिशेने रवाना
महाविकास आघाडीच्या बैठकीचे नाना पटोले यांनी पाठवलेल्या पत्रावर प्रकाश आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर नाना पटोले यांना पुन्हा प्रकाश आंबेडकरांनी पत्र पाठवले. त्यानंतर जयंत पाटलांनी प्रकाश आंबेडकर यांना फोन केला. त्यांनी कॉन्फरन्स कॉलवर कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनीथला यांच्याशी बाळासाहेब आंबेडकरांचे बोलणं करून दिले. त्यावरती बोलतांना रमेश चेन्नीथला यांनी सांगितलं की महाराष्ट्रात यासंदर्भात बोलणी करण्याचे अधिकार कॉंग्रेसने बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या दोन कॉंग्रेसच्या नेत्यांकडे दिलेले असल्याचे सांगितले.
हेही वाचा…मुहूर्त शोधला..! महाविकास आघाडीतील दोन बडे नेते भाजपात प्रवेश करणार ?
पुढच्या वेळेला महाविकास आघाडीची जी बैठक होईल त्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकरांनी सहभागी व्हावं अशी विनंती त्यांनी केली. रमेश चेनीथला यांची ही विनंती बाळासाहेब आंबेडकर यांनी मान्य केली आहे. असे वंचितचे सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले.
हेही वाचा…“..तरच आम्ही जागा वाटपाच्या बैठकीला येऊ,” महाविकास आघाडीने दिलेले निमंत्रण वंचितने नाकारले
दरम्यान, काल महाविकास आघाडीची जवळपास सहा तासानंतर बैठक संपली. या बैठकीसाठी कॉंग्रेसचे नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेकडून संजय राऊत, विनायक राऊत, तसेच सीपीआयचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. लोकसभेच्या ४८ जागांवर चर्चा झाली. तसेच जागावाटप हे सुरळीत पार पडले असून येत्या ३० तारखेला पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीसाठी प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा निमंत्रण देण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा“….केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील ‘या’ १२ मान्यवरांना पद्म पुरस्कार
हेही वाचा..“मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांना प्राथमिक सोयी सुविधा पुरवा,” रोहित पवारांची महापालिकेकडे मागणी
हेही वाचा…सकाळी झोपतच घेतली माझी सही, जरांगे पाटलांचा गंभीर आरोप, मनोज जरांगे पाटलांची मोठी फसवणूक ?
हेही वाचा…“तिघांपैकी एकाने यावं, अन् तोडगा काढावं, लगेच माघारी फिरतो,” जरांगे पाटलांची भूमिका
हेही वाचा…मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर..! “२६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करण्याचा भुजबळांचा मान डावलला”