मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर पोहचला आहे.वाशीत आज मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा पार पडणार आहे. त्यानंतर ते मुंबईतील आझाद मैदानावर आपलं उपोषण सुरू करणार आहेत. त्याआधी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज वाशीत मनोज जरांगे पाटलांना जीआर दिला असून आज ते दोन वाजता यावर वाचन करणार आहेत. आता याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत कडक इशारा दिला आहे.
हेही वाचा“….केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील ‘या’ १२ मान्यवरांना पद्म पुरस्कार
मराठा आरक्षणाबाबात राज्य सरकारने तोडगा काढला नाही तर मुंबईत हाहाकार माजेल. अशी शक्यता खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. तसेच अशा प्रकराचं गरजू मराठ्यांचा वादळ मुंबईत येत आहे. ज्याठिकाणी मनोज जरांगे पाटील आहेत. तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: जाऊन मनोज जरांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री दोन ते तीन दिवस शेतात काही तरी उपटत होते. त्यामुळे त्यांनी आता ही उपटा उपटी थांबवून जरांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे. असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा..“मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांना प्राथमिक सोयी सुविधा पुरवा,” रोहित पवारांची महापालिकेकडे मागणी
दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार टिका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे. ती आता मुंबईत निर्माण होऊ पाहत आहे. त्याकडे त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. एका पक्षाचं काम नसून राज्यातील सर्व पक्षांना एकत्रित घेऊन त्यावर तोडगा काढला पाहिजे. असेही संजय राऊतांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य..! मुंबईत पोहचण्याआधीच आंदोलक माघारी घेणार ?
हेही वाचा..मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला काही समाजकंठकाकडून गोडसेच्या जयजयकाराच्या घोषणा, पंढरपुरात नेमकं काय घडलं?
हेही वाचा…मराठा वादळ मुंबईत येण्याआधीच राज्यपालांचं मोठं विधान, मराठा आरक्षणाबाबत वेगाने हाचलाची सुरू*
हेही वाचा…जागा वाटपाच्या चर्चेवर प्रकाश आंबेडकरांची नाराजी, जयंत पाटलांचा एक फोन अन्…