मुंबई : ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे, त्यांना जिल्हा परिषदचे गुण मिळत नाही, संबंधीत शाळांनी त्यासंदर्भात प्रस्ताव पाठवलेला नसतो, सरकारच्या दिरंगाईपणामुळे विद्यार्थ्यांचं भविष्याचं वाटोळं कशासाठी? मग अशा मुजोर अधिकाऱ्यांना सरकारने खडसावण गरजेचं आहे, जर सरकारला हे जमत नसेल तर हाथ जोडून नाही तर हाथ सोडून मनसे स्टाईल ने आम्ही समजावू असं वक्तव्य मनसे नेत्या आणि पुणे पदवीधरच्या उमेदवार रुपाली ठोंबरे यांनी पॉलिटिकल महाराष्ट्र सोबत बोलताना केलं आहे.
आम्हाला अशा प्रकारची आंदोलन करण्याची मुळीच इच्छा नाही, पण या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग करण्यासाठी आम्हाला सरकार आणि प्रशासनाला वठणीवर आणावं लागत, ज्या लोकांना कामच करायचं नाही अशा लोकांना आमचं औषध प्रभावी ठरत असं हि त्या म्हणाल्या आहेत. स्त्री हि राजकारणात वापरण्याची गोष्ट नाही, कंगना रानौत ने एका विशिष्ट्य पक्षाला फायदा होण्यासाठी घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची आहे असं हि त्यांनी नमूद केलं आहे.
कोरोनाची जागतिक महामारीच्या काळात पुण्यात जम्बो कोवीड सेंटर उभारल गेलं त्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने २०० कोटी रुपये खर्च केले पण त्यात पारदर्शकता कुठेय? असा सवाल मनसे नेत्या आणि पुणे पदवीधर निवडणुकीच्या उमेदवार रुपाली ताई ठोंबरे यांनी केला आहे. त्यासाठी पुणे महानगरपालिका निधी देण्यास नकार देत होती तेव्हा आम्ही पुणे महापालिकेत आंदोलन केलं, त्यानंतर त्या आंदोलनानंतर सुद्धा रुग्णांना योग्य त्या सुविधा दिल्या जात नव्हत्या, लोक मरत होती, सरकार आणि महापालिका म्हणून त्यांना सुविधा देणं आपली जबाबदारी आहे, ती देण्यात महाविकास आघाडी सरकार आणि पुणे महानगरपालिका अपयशी ठरलीये, अशी टीका ठोंबरे यांनी केली आहे.
रुग्णांना होणारा त्रास आणि जाच हे आम्ही पाहिलं आणि त्यांची मदत आणि प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत गेलो, त्यामुळेच आज जनमानसाच्या मनात मनसे स्थान निर्माण करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जिथं जिथं जनतेवर अन्याय होईल तेथे मनसे पॅटर्न ने आम्ही आंदोलन करू आणि जनतेच्या समस्याच निराकरण करत राहू, त्यासाठी आम्हाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांचा खंबीर पाठिंबा आणि मार्गदर्शन नेहमी मिळत आहे असं हि त्यांनी नमूद केलं आहे.
Read Also :
‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी उद्धव ठाकरेंची अवस्था, नारायण राणेंची टीका
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक, शरद पवारांनी घेतली भेट
चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून निवडणूक लढवली तर त्यांचं डिपॉझिट जप्त होईल : मंत्री हसन मुश्रीफ