महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांवर ‘मागण्यांचा पोळा’ साजरा करण्याची वेळ आली आहे. तसेच कोणत्याही मागण्या मान्य न करता सरकारकडून दूध उत्पादकांची चेष्टा सुरू आहे. असा आरोप भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सरकारविरोधात अनेक ठिकाणी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यानंतर आता विखे पाटील यांनी देखील पोळ्याचे निमित्त साधत सरकारच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांवर मागण्यांचा पोळा साजरा करण्याची वेळ आली असल्याचे म्हणत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
सरकार मधील मंत्र्यांचाच दूध दरवाढीला विरोध असल्यामुळे सरकार यावर निर्णय घेत नाही असा आरोप देखील यावेळी विखे पाटील यांनी केला आहे. बैलपोळीनिमित्त आपल्या सोशल मीडियावरून याबाबतचे फोटो टाकत विखे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
‘जाणते राजे’ ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गप्प का आहेत ? असा सवाल यावेळी विखे यांनी नाव न घेता शरद पवार यांना विचारला आहे. महाविकास आघाडीच्या सरकार विरोधात गेल्या काही दिवसांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांरी आपली नाराजी व्यक्त करत ठीक ठिकाणी आंदोलने देखील केली होती.
'जाणते राजे'ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गप्प का आहेत ? 2/2
— R Vikhe Patil (@RVikhePatil) August 18, 2020