मुंबई –आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने कंबर कसलेली असताना शिवसेनेनेही मिशन मुंबई हाती घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली, या बैठकीत शिवसैनिकांना निवडणुकीसाठी तयारीत राहण्याचे आदेश दिले. दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपा-मनसे एकत्र येणार का? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे
आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मनसे सोबत जाणार कि नाही याबाबदल स्पष्टीकरण दिले आहे. राज्य सरकार नाकर्तेपणा दाखवत आहे, आम्ही विरोधी पक्षात काम करत आहोत. मात्र, तीन पक्षांची अनैसर्गिक आघाडी असणारे सरकार टिकणार नाही. ज्या दिवशी हे सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीबद्दल विधान केले होते. “आमचं परप्रांतियांबाबतचं धोरण ते स्वीकारणार नाहीत. त्यांनी त्यांचं धोरण बदलायला हवं असं ते म्हणाले. धोरण बदलल्याशिवाय त्यांच्यासोबत युती होऊ शकत नाही”, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती.
Read Aslo –
आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीचे छापे
गेल्या 6 वर्षात एकातरी भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का?, सावंतांचा सवाल
‘आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही .. ‘; ईडीच्या छापेमारी नंतर राऊतांची प्रतिक्रिया