मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या राज्यपालनियूक्त 12 जागांसाठीची नावं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सोपवली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांना प्रत्येकी चार जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये या तिनही पक्षांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना संधी दिली आहे.
पण भाजपची पार्श्वभूमी असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या नावाला राज्यपाल सहमती देणार का? हा खरा प्रश्न आहे कारण राज्यपालांनी या विषयांवरील आमदारांची निवड करताना मी काटेकोरपणे नियमांचं पालन करणार आहे असं आधीच सुचवलं होतं. एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी या दोघांची नावं सहकार क्षेत्रात काम केल्याबद्दल देण्यात आली आहे.
प्रा.नितिश बानगूडे, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, गायक आनंद शिंदे, यशपाल भिंगे यांना फार अडचण होईल अशी सध्या परिस्थिती नाही, पण एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांना राजकीय पक्षांची पार्श्वभूमी असल्याने त्यांची अडचण होण्याची शक्यता आहे.
Read Also :
असदुद्दीन ओवेसी म्हणजे दुसरे जिना, शायर मुनव्वर राणांची बोचरी टीका
मेधा कुलकर्णी भाजप सोडणार का? म्हणाल्या….
….तर राज्यात अक्षता पडायच्या आधीच नवरी पळाली, मंत्री वडेट्टीवारांचा दानवेंना टोला
नितीश कुमार यांना मिळणार मुख्यमंत्रीपद पण एनडीएच्या ‘या’ अटी आणि ही ‘नियम’ पाळावी लागणार