नागपूर : भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी एका सभेत राज्य सरकारला ‘चोरून लग्न केलं, संसार थाटला, मग बापाला पैसे का मागता, असं वक्तव्य केलं होतं. औरंगाबाद येथे गुरुवारी झालेल्या सभेतही दानवे यांनी ” हे मोदींकडे पैसे मागतात मी इतकंच म्हणालो की, चोरून संसार तुम्ही करता, पैसे बापाकडे मागता.
आता आमच्याकडे कशाला पैसे मागता, तुमचं सरकार म्हणजे तुमची जबाबदारी आहे” असं टीकास्त्रही त्यांनी ठाकरे सरकारवर सोडलं होतं. दानवे यांच्या या वक्तव्याचा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चांगलाच समाचार घेतलाय. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोणाचाही बाप काढायचा अधिकार नाही.
भाजपनं बिहारमध्ये गेल्या वेळी दुसऱ्याची बायको पळवून आणली होती. राज्यातही सकाळी सकाळी गुपचूप लग्न केलं होतं, मात्र, संसार टिकला नाही, अक्षदा पडायच्या आधीच नवरी पळाली, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी रावसाहेब दानवे आणि भाजपवर सडकून टीका केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी केंद्राचा निधी म्हणजे त्यांच्या बापाचे पैसे आहेत का?, त्यांच्या बापाने कमवून ठेवले का?,असा प्रश्न दानवे यांना केला. रावसाहेब दानवे येऊन जाऊन बाप काढतात, दानवे यांना विचारा त्यांचे बाप कोण आहे, कोणाचे बाप, किती बाप?, असा सवाल वडेट्टीवार यांनी केलाय. केंद्र सरकार राज्याला मदत करते म्हणजे उपकार करत नाही, तो आमचा हक्क आहे, एनडीआरएफ च्या निकषावर मदत दिलीच पाहिजे, दानवे यांना निकष माहीत नाहीत का? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी विचारला.
Read Also :
नितीश कुमार यांना मिळणार मुख्यमंत्रीपद पण एनडीएच्या ‘या’ अटी आणि ही ‘नियम’ पाळावी लागणार
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा स्वभाव लय भारी’, मंत्री अशोक चव्हाणांनी उधळली स्तुतीसुमने
देशातील डिजीटल माध्यमांवर केंद्र शासनाने लावला अंकुश, गृहमंत्री अनिल देशमुखांकडून केले स्वागत
ईडी काय तुमच्या बापाची आहे का? असेल तरी तुम्हाला आम्ही 25 वर्ष घरी बसवणार : शिवसेना नेते संजय राऊत
अर्णब गोस्वामीचा थेट भाजपशी संबंध, म्हणून देवेंद्र फडणवीसांनी प्रकरण दाबले…
किरीट सोमय्या यांनी केली मुंबईच्या महापौर आणि ठाकरे सरकार विरोधात जनहित याचिका याचिका
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणजे महाभारतातले ‘शिखंडी’ : महापौर किशोरी पेडणेकर