पाटणा : जनता दल यूनायटेडचे अध्यक्ष नितीशकुमार यांच्या गळ्यात सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार असल्याचे जवळ-जवळ निश्चित मानले जात आहे. मात्र, यावेळी नितीशकुमार यांच्यासमोर बरीच आव्हानं असणार आहेत. यावेळी बिहारमध्ये सत्तेचे समीकरण आणि बिहारचे राजकीय वातावरण दोन्हीही वेगळे आहेत. मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सांभाळायची म्हटल्यावर नितीशकुमार यांना यावेळी बरीच मेहनत घ्यावी लगणार आहे.
स्थिर सरकारसाठी प्रयत्न
नितीशकुमार यांच्यासोबत आणखी तीन पक्ष सत्तेत असतील. त्यांच्यासोबत समन्वय साधून स्थिर सरकारसाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. नितीशकुमार यांना कुणाच्याही हस्तक्षेपाविना तसेच पूर्ण खंबीरपणे काम करायला आवडतं. तशी त्यांची ख्याती आहे. त्यांच्या कामाच्या या पद्धतीमुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीकाही होत आली आहे. मात्र, यावेळी बिहारच्या जनतेने दिलेल्या कौलामुळे नितीशकुमार यांच्यासोबतच भाजप आणि इतर दोन पक्षांचाही सरकारमध्ये तेवढचा वाटा असणार आहे. त्यामुळे त्यांना पहिल्यासाखे धडाडीने निर्णय घेण्याअगोदर आपल्या मित्रपक्षांशी सल्लामसलत करावी लागेल. त्यांच्यासमोर स्थिर सरकार ठेवण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
नितीशकुमारांच्या पक्षाला कमी मंत्रिपदं, स्वपक्षातील नाराजी
बिहार निवडणुकीत नितीशकुमारांचा जदयू पक्ष थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. जदयूचा मित्रपक्ष असलेल्या भाजपला यावेळी जदयूपेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे यावेळी नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात खुद्द त्यांच्याच पक्षाचे मंत्री कमी असतील. तसेच जीतनराम मांझी आणि मुकेश साहानी यांच्याही पक्षाला मंत्रिमंडळात पुरेसे स्थान द्यावे लागणार आहे. बिहारमध्ये जास्तीत जास्त 36 मंत्रिपदं देता येऊ शकतात. अशा परिस्थितीत स्वपक्षातील नाराजी, मित्रपक्षांचे समाधान या सर्व गोष्टी नितीशकुमार यांना आगामी काळात सचोटीने हाताळाव्या लागणार आहेत.
मजबूत विरोधी पक्षाचे आव्हान
यावेळी राष्ट्रीय जनता दलाच्या रुपात नितीशकुमार यांना प्रबळ विरोधी पक्षाला सामोरे जावे लागणार आहे. तेजस्वी यादव यांच्या रुपाने बिहारमध्ये नवं नेतृत्व उभ राहू पाहतं आहे. त्यामुले तेजस्वी यादव यांचाही त्यांना वेळोवेळी सामना करावा लागेल.
दरम्यान, नितीश यांच्यासमोर त्यांच्या स्वत:ची राजकीय प्रतिष्ठा कायम राखण्याचेची आव्हान असेल. तब्बल सहा वेळा मुख्यमंत्रिपदी राहीलेल्या नितीशकुमार यांच्यासमोर त्यांची राजकीय प्रगल्भता दाखवून सरकार पाच वर्षे टिकवण्याचे आव्हान असणार आहे.
Read Also :
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा स्वभाव लय भारी’, मंत्री अशोक चव्हाणांनी उधळली स्तुतीसुमने
देशातील डिजीटल माध्यमांवर केंद्र शासनाने लावला अंकुश, गृहमंत्री अनिल देशमुखांकडून केले स्वागत
ईडी काय तुमच्या बापाची आहे का? असेल तरी तुम्हाला आम्ही 25 वर्ष घरी बसवणार : शिवसेना नेते संजय राऊत
अर्णब गोस्वामीचा थेट भाजपशी संबंध, म्हणून देवेंद्र फडणवीसांनी प्रकरण दाबले…
किरीट सोमय्या यांनी केली मुंबईच्या महापौर आणि ठाकरे सरकार विरोधात जनहित याचिका याचिका
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणजे महाभारतातले ‘शिखंडी’ : महापौर किशोरी पेडणेकर