पुणे : आरक्षण नसल्याने धनगर समाजाचा शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय विकास खुंटला आहे. त्यामुळे समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्याची जाणीव करून देण्यासाठी ‘यशवंत ब्रिगेड’ संघटनेच्याच्या वतीने धनगर समाजाचा २२ फेब्रुवारी रोजी मुंबईत मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे.
धनंजय मुंडेविरोधात कोणतीही निवडणूक लढवणार नाही; करुणा मुंडेचा ‘त्या’ वक्तव्यांवरून यु-टर्न
राज्यात धनगर समाजाची लोकसंख्या दोन कोटींपेक्षा अधिक आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेशाच्या अंमलबजावणीसाठी अनेक वर्षे लढा सुरु आहे. सरकारचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जातीचे (एसटी) आरक्षण दिले आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे महामोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच, २८ फेब्रुवारीला बारामतीत धनगर समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. २८ फेब्रुवारीला महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. त्यामध्ये धनगर समाजाच्या मागण्यांचा गांभीर्य पूर्वक विचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
यशवंत ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष बापूराव सोलनकर, यशवंत छावा संघटनेचे अध्यक्ष काकासाहेब मारकड, गणपतराव देवकाते, आनंद कोकरे, डॉ. संदीप घुगरे, संपतराव टकले, वसंतराव शेळके, चंद्रकांत वाघमोडे, पोपटराव धवडे, शंकरराव ढेबे, मल्लिकार्जुन पुजारी, सौरभ हटकर, राज पाटील, वसंत घुले आदींच्या वतीने ही मागणी केली आहे.
Read also:
- येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार; किरीट सोमय्यांचा इशारा
- शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार; कोट्यावधीची बेनामी मालमत्ता असल्याचा आरोप
- भाजप आमदार आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी; कुटूंबही संपवण्याचा दिला इशारा
- विकासकामांमध्ये टक्केवारी खाण्याची पीएचडी झालेल्यांची माझ्यावर बोलायची लायकी नाही – राजू पाटील
- कोल्हापुरात सत्तारूढ गटातील ज्या नेत्यांमुळे पराभव झाला त्यांना किंमत चुकवावीच लागणार; विनय कोरेंचा इशारा