कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी राजकारण तापण्यास सुरुवात झाली होती. महाविकास आघाडीमध्ये उभी फूट या निवडणुकीदरम्यान पडली होती. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,पालकमंत्री सतेज बंटी पाटील, आमदार विनय कोरे यांनी वेगळी मोट बांधली होती. त्यांना आव्हान म्हणून शिवसेनेने देखील आपला विरोधी पॅनल घोषित केला होता.
“मग सामनातून अग्रलेखातून रोज गरळ ओकणाऱ्या संपादकांना रोज अटक का होत नाही?”
कालच निवडणुकीचा निकाल लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची सत्ता कोल्हापूर जिल्हा बँकेवर येणार आहे हे निश्चित झाले असले तरी शिवसेनेने जो धक्का त्यांना दिला आहे तो धक्का खूप जबरदस्त आहे. आमदार प्रकाश आवडे यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवानंतर सत्तारूढ गटातील नेते आणि जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी आपली नाराजी थेट बोलून दाखवली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वच जागा आमच्या पारड्यात पडतील असं वाटत असताना चार जागांवर झालेला पराभव क्लेशदायक आहे.
“एसटी आंदोलनामुळं 600 कोटींचं नुकसान; ST खड्ड्यात जाणार नाही याची काळजी घ्या”
सत्तारुढ आघाडीच्या तीन उमेदवारांचा पराभव हा कोल्हापूर जिल्यातील मोठ्या नेत्यांच्या विश्वासघातामुळे झाला आहे. हे न समजण्याएवढे कोल्हापुरातील कार्यकर्ते अज्ञानी नाहीत. प्रत्येकाला विकासापेक्षा राजकारणातील गट-तट, मोठेपणा याला महत्व दिल्याचे स्पष्ट होते. ज्यांनी हे पाप केले आहे, त्यांना मात्र त्याची किंमत योग्यवेळी चुकवावी लागेल, असा इशारा विनय कोरे यांनी यावेळी दिला आहे. आमदार प्रकाश आवाडेंसारख्या दिग्ग्ज नेत्यांचा जिल्हा बँकेत पराभव होणे हे कशामुळं झालं ? का केलं गेलं ? हे आगामी काळात स्पष्ट होईल. मात्र जर सत्तारूढ गटातील सर्वच नेत्यांनी आपली ताकद योग्यरीत्या लावली असती तर नक्कीच निकाल काही तरी वेगळा लागला असता असं देखील कोरेंनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवलं.
Read also:
- पंतप्रधानांविषयी कारस्थानाच्या चौकशीत हस्तक्षेपाबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कारवाई करा – चंद्रकांत पाटील
- धनंजय मुंडेविरोधात कोणतीही निवडणूक लढवणार नाही; करुणा मुंडेचा ‘त्या’ वक्तव्यांवरून यु-टर्न
- संजय राऊत आणि गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे – चित्रा वाघ
- ‘डान्सिंग डॉल’ची उपमा देणं पडलं महागात; अमृता फडणवीसांचा विद्या चव्हाणांवर अब्रुनुकसानीचा दावा
- पंतप्रधान मोदींच्या ताफ्यावर दगडफेक झाली; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा जावई शोध