मुंबई : पंतप्रधान मोदी पंजाब दौऱ्यावर असताना ते १५-२० मिनिटं एका उड्डाणपुलावर अडकून पडले होते. तसेच त्यांच्या सुरक्षेमध्ये गंभीर चूक असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. पण, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पंतप्रधानांवर हल्ला झाल्याचा साक्षात्कार झालाय की काय असं दिसतं. कारण त्यांनी एक नवीन जावई शोध काढला आहे. तसं वक्तव्य देखील केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे.
सत्तार-दानवेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण; सोयगाव नगरपंचायतीत कार्यकर्ते संभ्रमात का?
राणे म्हणतात, ”पंतप्रधान मोदी पंजाबच्या दौऱ्यावर होते. ते त्याठिकाणी विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी जात होते. त्यासाठी ते हेलिकॉप्टरने जाणार होते. पण, वातावरण खराब असल्याने रस्त्यानं गेले. रस्त्यावर त्यांना थांबवून समोरून दगडफेक करण्यात आली. तसेच पंतप्रधानांवर हल्ला करण्यात आला”, असा अजब तर्क नारायण राणे यांनी लढवला आहे. तसेच त्या घटनेचा निषेध देखील त्यांनी नोंदवला असून काँग्रेसवर टीका केली आहे. अशा घाणेरड्या गोष्टी आणि षडयंत्र काँग्रेसच करू शकतं, असं राणे म्हणाले.
मोदींच्या पुण्याईमुळे निवडून येतात म्हणणाऱ्या भुजबळांवर चंद्रकांत पाटील संतापले, म्हणाले…
काही लोक म्हणतात पंतप्रधान मोदींच्या ताफ्यावर दगडफेक झाली. पण, वय कमी झालं की माणसाला कमी दिसतं. पण, काही लोकांना वय जास्त झाल्यानंतर जास्त दिसत असेल तर माहिती नाही. ही घटना घडवून आणली आहे, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी नारायण राणेंना टोला लगावला आहे.
Read also:
- “एसटी आंदोलनामुळं 600 कोटींचं नुकसान; ST खड्ड्यात जाणार नाही याची काळजी घ्या”
- “मग सामनातून अग्रलेखातून रोज गरळ ओकणाऱ्या संपादकांना रोज अटक का होत नाही?”
- कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेचा सत्तारूढ गटाला धक्का; आमदार प्रकाश आवाडेंचा पराभव
- काँग्रेसने कमरेखालचे वार करणं सोडून द्याव; पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेवरून विक्रांत पाटील कडाडले
- सत्तार-दानवेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण; सोयगाव नगरपंचायतीत कार्यकर्ते संभ्रमात का?