मुंबई : ५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान फिरोजपूर येथे नरेंद्र मोदी यांची मोठी सभा होणार होती. पण या सभेला जाताना काही आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यायच्या ताफ्याला अडवलं. पंतप्रधान मोदींचा ताफा जवळपास 15 ते 20 मिनिट घटनास्थळी थांबला होता. दरम्यान या घटनेवर भाजपकडून काँग्रेसवर सडकून टीका केली जात आहे. काँग्रेसने कमरेखालचे वार करणं सोडून द्याव, असा घणाघात भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला आहे.
माझं सोडा सत्तार यांना कोणीचं गांभीर्याने घेतं नाही; सत्तारांची पाठ फिरताच दानवेंनी सोडला टीकेचा बाण
विक्रांत पाटील म्हणाले, पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यामध्ये दुर्दैवी घटना घटली. पंतप्रधान हे देशाचे पंतप्रधान आहे. ते केवळ भाजप पक्षाचे पंतप्रधान नाहीत. जगभरातून त्यांना मान्यता आहे, लोक त्यांना सॅल्यूच ठोकतात. परंतू, फ्लायओव्हरवर त्यांचा ताफा रोखण्यात आला. पंजाबच्या सरकारने ठरवून केलेला डाव होता. देशाचे पंतप्रदान देशाचे आहेत. परंतू, काँग्रेसकडून घानेरड राजकारण केलं जात आहे. आपल्या राज्यात परदेशातील पंतप्रधान आले तर त्यांना सुद्धा सर्व प्रोटोकॉल द्यावे, लागलात. मग भारताच्या पंतप्रधानांबद्दल हलगर्जीपणा का केला गेला. काँग्रेसने असले कमरेखालचे वार करणं सोडून द्या, असेही पाटील म्हणाले.
पंतप्रधानांच्या सुरक्षेबद्दलचा गाफीलपणा हा एक सुनियोजित कट; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप
पुढे बोलताना ते म्हणाले, पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवरच का थांबवण्यात आला. पंजाब सरकारने पोलिसांच्या मदतीने आणि तेथील सहकाऱ्यांच्या सहकार्याने पंतप्रधानांचा ताफा अडवण्याचा डाव रचला. तेथील काही स्थानिकांना जाणीवपुर्वक आंदोलन करण्यास सांगण्यात आले. परंतू, नियतीला हे मान्य नव्हत. कारण देशाचे पंतप्रधान हे विकासाच्या बाजून आहेत. त्यामुळे नियतीने हा डाव हाणून पाडला.
मुख्यमंत्र्यांना १० लाख पत्र पाठवणार
विद्यापीठा नविन विधेयक मंजूर करून आर्थिक मलीदा लाटण्याचा डाव राज्य सरकार घातला आहे. त्यामुळे हे विधेयक रद्द करा, यामागणीसाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना १० लाख पत्र पाठवणार आहोत. त्याचबरोबर विद्यापीठाचा मलीदा घशात घालण्याची घाई झालेल्या मंत्री उदय सामंत यांना १ लाख मॅसेजस पाठवणार आहोत. त्याचबरोबर १ लाख फोन मिसकॉल करणार आहोत. तसेच ई-मेलच्या माध्यमातून एक लाख ईमेल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना पाठवणार असून राज्यभर आंदोलन उभारणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
Read also:
- सत्तार-दानवेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण; सोयगाव नगरपंचायतीत कार्यकर्ते संभ्रमात का?
- मोदींच्या पुण्याईमुळे निवडून येतात म्हणणाऱ्या भुजबळांवर चंद्रकांत पाटील संतापले, म्हणाले…
- सध्या तरी संपूर्ण लॉकडाऊन नाही, रुग्ण वाढले तर कठोर पावलं उचलू – महापौर किशोरी पेडणेकर
- ‘घटिया सोच’ म्हणताच खासदार प्रियांका चारतुर्वेदींनी आमदार राम सातपुतेंना केलं ब्लॉक
- पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत तडजोड होणार नाही; संजय राऊतांचा पंजाब प्रकरणावरून गंभीर इशारा