औरंगाबाद – राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर गडकरी यांनी भाजपा-शिवसेना युतीचा पूल बांधला तर सत्तार यांनी भाजपा-शिवसेना एकत्र येऊ शकतात, असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आणखीनच महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. लगेच दुसऱ्या दिवशी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांची दिल्लीत गळाभेट झाली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेची चर्चा सुरू असतानाच या दोन्ही मंत्र्यांची भेट आणि सत्तार यांच्या वक्तव्याने आणखी चर्चेला उधाण आले. सत्तार तर वक्तव्य करून मोकळे झाले, मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्ते संभ्रमात पडले. नगर पंचायत निवडणुकीत भाजपाकडून कोणती भूमिका घेतली जाणार यावरून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
नवीन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यातच करा; आमदार महेश लांडगे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
पहिल्या टप्प्यात सोयगाव नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी निवडणूक झाली. निवडणूक प्रचारादरम्यान भाजपा-शिवसेनेत चिखलफेक झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये तेढ निर्माण झाला आहे. आता आणखी चार जागांसाठी निवडणूक होत असताना सत्तार यांनी नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन भाजपा-शिवसेना युतीचे संबंध पुन्हा सुधारू शकतात, असे सांगितले. त्यानंतर रावसाहेब दानवे यांची भेट घेतल्याचा फोटो व्हायरल झाला होता. उर्वरित चार जागांसाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर विरोधाला सामोरे जावे लागणार असल्याने आता संभ्रम निर्माण झाला आहे.
माझं सोडा सत्तार यांना कोणीचं गांभीर्याने घेतं नाही; सत्तारांची पाठ फिरताच दानवेंनी सोडला टीकेचा बाण
अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे नगर पंचायत निवडणुकीत भाजपा-शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कमी झाल्याची शक्यता आहे. निवडणूक प्रचाराच्या मागील टप्प्यात सोयगावमधील जमीन बळकावण्यापासून ते सोलापूर-जळगाव रेल्वेच्या शुभारंभापर्यंत विकासकामाचे वाभाडे दोन्ही पक्षांच्या प्रचारप्रमुखांनी काढले होते. त्यामुळे उर्वरित चार जागांसाठी आगामी निवडणुकीत भाजपा-शिवसेना कुठे प्रचार करणार आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना सावध राहणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Read also:
- मोदींच्या पुण्याईमुळे निवडून येतात म्हणणाऱ्या भुजबळांवर चंद्रकांत पाटील संतापले, म्हणाले…
- सध्या तरी संपूर्ण लॉकडाऊन नाही, रुग्ण वाढले तर कठोर पावलं उचलू – महापौर किशोरी पेडणेकर
- ‘घटिया सोच’ म्हणताच खासदार प्रियांका चारतुर्वेदींनी आमदार राम सातपुतेंना केलं ब्लॉक
- पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत तडजोड होणार नाही; संजय राऊतांचा पंजाब प्रकरणावरून गंभीर इशारा
- पंतप्रधानांच्या सुरक्षेबद्दलचा गाफीलपणा हा एक सुनियोजित कट; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप