पिंपरी चिंचवड : जागेच्या प्रश्नावरून कायम चर्चेत असलेल्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेची मान्यता केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने रद्द केली आहे. त्यामुळे आघाडी सरकारला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. त्यामुळे पुणेकरांचे भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न लांबणीवर पडण्याची शक्यता येत असतानाच नवीन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यातच करण्यात याव, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मला अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंना…; विद्यापीठ कायद्यावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक
पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संरक्षण मंत्रालयाने नवीन जागेला साईट क्लिअरन्स म्हणजे जागा परवानगी नाकारली असल्याची माहिती मराठा चेंबरचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक पट्टयात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे गरजेचे आहे. गेल्या १० वर्षांपासून विमानतळाचा प्रश्न प्रलंबित होता. राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकारने पुरंदर येथील जागेची निवड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने जागेत बदल केला. आता संरक्षण मंत्रालयाने ‘साईट किल्अरन्स’ नाकारला आहे.
राज्यातील महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
त्यामुळे पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील तळेगाव -चाकण- रांजणगाव येथील इंडस्ट्रिअल हब, हिंजवडी-तळवडे मधील IT हब आणि पिंपरी-चिंचवडमधील झपाट्याने वाढणारा रेसिडेन्सिअल कॉरिडॉरच्या दृष्टीने भविष्यातील २५ वर्षांचा विचार करता खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे लॉगिस्टिक विमानतळ व्हावे, अशी आमची आग्रही मागणी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षाही आमदार लांडगे यांनी व्यक्त केली आहे.
Read also:
- माझं सोडा सत्तार यांना कोणीचं गांभीर्याने घेतं नाही; सत्तारांची पाठ फिरताच दानवेंनी सोडला टीकेचा बाण
- चंद्रकांत पाटलांचे ‘युती’चे संकेत अन् महेश लांडगेंची शिवसेनेच्या कार्यक्रमाला हजेरी!
- नाना पटोले, नौटंकी करणे तुमचा स्वभाव, मोदीजींबद्दल तोंड सांभाळून बोला – चंद्रकांत पाटील
- काँग्रेसप्रणित पंजाब सरकारचा पिंपरी-चिंचवड भाजपाकडून निषेध; पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातील सुरक्षेबाबत बेफिकीरी
- मुंबई-पुण्यातील विद्यापीठांचे JNU करायचे आहे काय? आशिष शेलारांचा हल्लाबोल