मुंबई : मुंबईत सध्यातरी संपूर्ण लॉकडाऊन होणार नाही. मात्र कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर मात्र कठोर पावलं उचलली जाऊ शकतात, असा इशारा मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला. तसेच, मिनी लॉकडाऊन हे सर्वांना परवडणारं असणार, असंही त्या म्हणाल्या.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाची लागण
सध्या रुग्णशय्यांची टक्केवारी 16.8% आहे. 22,222 रुग्णशय्या गंभीर आणि जास्त लक्षणं असणाऱ्यांसाठी बेड आहेत. आता 20,181 बधितांची संख्या आहेत. रुग्णालयात 1,170 रुग्ण दाखल आहेत. गेल्या आठवड्यात हेच बोलत होतो की 20 हजाराच्या पलीकडे रुग्णांची टक्केवारी वाढली तर खूप काळजी घ्यावी लागेल. मुंबईच्या नागरिकांनी घाबरून जाण्यापेक्षा गांभीर्याने विचार करायला हवाय. ठामपणे जशी दुसरी लाट आपण रोखली, तशी रोखण्यासाठी घालून दिलेले निर्बंध पाळायला हवेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि इतर मंत्री माझ्या नागरिकांना कसं वाचवता येईल, याबाबत सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेतायेत, असं त्या म्हणाल्या.
“खरंतर भाजपने माझ्या घरच्यांची माफी मागायला हवी..”; जितेंद्र आव्हाडांची भाजपवर जोरदार टीका
संपूर्ण लॉकडाऊन होईल का या भीतीने लोक धास्तवले आहेत. संपूर्ण लॉकडाऊन सध्या तरी होणार नाही. पण, जर काही बेफिकीर नागरिकांमुळे कोरोना रुग्ण संख्या वाढत राहिली तर काही कठोर पावलं उचलली जाऊ शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं. WHO म्हणतंय, ओमिक्रॉन गंभीर नाही, असं समजू नका. गंभीर परिणाम होऊ शकतो, असंही त्या म्हणाल्या.
पोलिसांनाही आता ‘वर्क फॉर्म होम’, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय
माझ्या माहितीनुसार स्वतः मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार या सर्वांशी बोलून निश्चितच कुठलातरी एक निर्णय होईल, अशी माहिती महापौरांनी विकेंड लॉकडाऊनबाबत दिली. तसेच, शनिवार आणि रविवारी मुंबईतून ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे राज्यातील धोक्याची पातळी ओलांडताना दिसत आहे. त्यावर मुख्यमंत्री हळुवारपणे पण खंबीर निर्णय घेताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे कदाचित संध्याकाळी 7 वाजेपर्यँत निर्णय येऊ शकतो. जे का निर्बंध लावले आहेत त्यामध्ये वाढ होऊ शकते, अशीही माहिती त्यांनी दिली.
“पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा हात तर नाही ना?”
मुख्यमंत्री सकारात्मक विचाराने चालले आहेत. उद्धव ठाकरे हे घीसडघाईने निर्णय घेणार नाहीत आणि धोक्याची पातळी ओलांडू देणारही नाही. त्यामुळे आपण जो काही विश्वास ठेवला आहे आणि पहिली, दुसरी लाट रोखली. त्यामध्ये आपण बऱ्यापैकी इतर राज्यांच्या तुलनेत सुस्थितीत राहिलो आहेत आणि राहू याची नागरिकांना खात्री आहे.
Read also:
- ‘घटिया सोच’ म्हणताच खासदार प्रियांका चारतुर्वेदींनी आमदार राम सातपुतेंना केलं ब्लॉक
- पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत तडजोड होणार नाही; संजय राऊतांचा पंजाब प्रकरणावरून गंभीर इशारा
- पंतप्रधानांच्या सुरक्षेबद्दलचा गाफीलपणा हा एक सुनियोजित कट; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप
- “एवढ्याशा घटनेचा राईचा पर्वत केला जातोय”; पंजाबच्या मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांचं मोठं विधान
- “सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावतायेत, आंदोलनाच्या नावावर त्यांनी वर्गणी गोळा केली”