हे लोक तेच आहेत जे गरिबांना केवळ व्होट बँक समजतात. यांच्यासाठी विकास, गरिबीचे उच्चाटन या गोष्टी केवळ निवडणुकांसाठीचे जुमले आहेत.’ यावेळी योगींनी विरोधकांना उद्देशून, त्यांच्यासाठी राजकारण हा केवळ धंदा असून तो चालवण्यासाठी ते कोणत्याही स्तरापर्यंत जाऊ शकतात, असा आरोप लगावला.
‘विरोधक सर्वकाही जात, धर्म आणि प्रदिशकतेच्या चष्म्यातून बघत असतात. समाजासाठी घटक असलेली ही लोकं आपली व्होट बँक साबूत राखण्यासाठी वाईट मार्गाचा अवलंब करून समाजातील ऐक्याच्या भावनेला बाधा आणू शकतात.’ येत्या ३ नोव्हेंबरला उन्नाव येथील बांगरमाऊ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका होणार आहेत. याच निमित्ताने भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी ते बोलत होते.
Read Also:
मराठा आरक्षण बैठकीला उदयनराजे भोसले अनुपस्थित राहण्याची शक्यता, बैठकीवर प्रश्नचिन्ह?https://t.co/ZhqZFwSaJY
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 7, 2020