नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांना आता थेट इशाराच दिला आहे. राज्यात सारं काही निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सुरू आहे. मात्र, आम्ही जुळवून घेतलंय. तुम्ही दिवस मोजा, असं जोरदार प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिल आहे.
पवार म्हणाले, आम्ही जर ठरवून घेतलं आहे की, जुळवून घ्यायचं. त्यामुळं हे सरकार सुरू आहे. आज सरकार जाईल, उद्या जाईल, असं दिवस मोजायचं काम त्यांना करावं लागेल. इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेंव्हा त्यांच्या विरोधातही नेतृत्व नव्हतं. मात्र, सगळ्या शक्ती मोरारजी देसाई यांच्या मागे उभ्या राहिल्या. त्यामुळं विरोधी पक्षाकडे चेहरा नाही, असं म्हणता येणार नाही. विक्रम गोखले यांच्या वक्तव्याची नोंद आपल्याला घ्यावी वाटत नाही. असे लोक समाजात, असा उल्लेख त्यांनी केला.
काँग्रेसने मित्र पक्षापासून सावध राहावे; नाना पटोलेंच्या मनात राष्ट्रवादीबद्दल सल?
महाराष्ट्रात काही संघटना अशा घटना करतात हे योग्य नाही. राज्यातील काही मोजक्या भागात या घटना घडल्या. या प्रवृत्तींना किती महत्त्व द्यायचं, हे लोकांनी ठरवावं. राज्य सरकार चांगलं काम करत असतांना तीन, चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे जाणीवपूर्वक केलं गेलं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी अमरावती आणि मालेगाव हिंसाचारावर दिली. तसेच पवार म्हणाले, विरोधकांच्या दृष्टीने भावना झाली की, मंत्र्यांच्या चौकशा वगैरे होणार. अधिकारासाठी याचा वापर केला जातो. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे.
“नवाब मालिकांच्या फिल्ममधे लवकरच माझी एंट्री होणार” संजय राऊत
शरद पवार हे आज निफाडमध्ये आले होते. यावेळी ते बोलत होते. तसेच त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली देखील दिली. पुरंदरे यांनी महाराष्ट्राच्या नव्या पिढीला इतिहास समजावा यासाठी काळजी घेतली. असे योगदान देणारे पुरंदरे आपल्यात नाहीत. त्यांनी शिवछत्रपतींच्या इतिहास ठेवला. तो वादग्रस्त ठरला. मात्र त्यावर बोलण्या इतका मी इतिहास अभ्यासक नाही. संपूर्ण आयुष्य ज्यांनी या कामात घातलं त्यांच्या बद्दल अशा बदनाम्या केल्या जातात. ते यांच्या बाबतही घडलं असावं, असंही ते म्हणाले.
Read Also :
एकत्र येण्याची इच्छा उरली नाही; भाजप- सेना युतीवर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
- बाबासाहेबांनी शिवरायांचा इतिहास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला, त्यांचे योगदान विसरून चालणार नाही
- शिवचरित्राचा महान उपासक गमावला, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली – चंद्रकांत पाटील
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची प्राणज्योत मावळली; अंत्यदर्शनाला गर्दी, मान्यवरांकडून श्रद्धांजली
- परळीची जनता हुशार आहे, कोणाला किती उडू द्यायचं हे त्यांना कळतं – पंकजा मुंडे