यवतमाळ : यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधित करणार आहेत. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा १६ व्या हप्त्यांचे वितरण देखील करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर कार्यक्रमाची जय्यत तयारी राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. तर या एका दिवसाच्या कायक्रमासाठी तब्बल १२ कोटी रूपयांचा खर्च महायुती सरकार करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा..जनतेला वेड्यात काढण्याचा महायुतीचं कामं, आधी आंतरवाली सराटीच्या लाठीचार्जची SIT चौकशी करा, मग..
यवतमाळ येथील जाहीर कार्यक्रमात मोदींच्या हस्ते किसान सन्मान निधी योजनाचा १६ वा हप्ता थेट लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी चा सुमारे ३८,०० कोटी रूपयांचा दुसरा व तिसरा हप्तादेखील वितरित केला जाणार आहे. तर याचा लाभ ८८ लाख शेतकऱ्यांना होणार असून यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. याची मोठी तयारी केली गेली असून ४५ एकरवर मंडप उभारण्यात आला आहे.
हेही वाचा…शिंदेंचा ‘हा’ माजी खासदार अजित पवार गटात करणार प्रवेश, कोल्हेंच्या विरोधात महायुतीची रणनिती ठरली ?
नरेंद्र मोदींच्या सभेसाठी भाजपकडून तसेच महायुतीकडून अमाप पैसा खर्च करण्यात आला आहे. यावरून वडेट्टीवारांनी जोरदार टिका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 1 दिवसाच्या कार्यक्रमासाठी जनतेच्या 12 कोटी 73 लाख रुपयांचा चुराडा महायुती सरकार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही तासांच्या कार्यक्रमासाठी खर्च केलेल्या इतक्या सरकारी निधीत यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब पुन्हा नव्याने उभे राहू शकले असते.
आधीच राज्याच्या डोक्यावर ८ लाख कोटीहून अधिक कर्ज झाले आहे. त्यात आर्थिक शिस्त न पाळणारे राज्यकर्ते सत्तेत. पंतप्रधानांचा कार्यक्रम असो की शासन आपल्या दारी आपली जाहिरात आणि प्रचार झालाच पाहिजे ‘ होऊ दे खर्च ‘ या सूत्राचे पालन करत महायुतीची उधळपट्टी सुरू आहे. असे वडेट्टीवारांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 1 दिवसाच्या कार्यक्रमासाठी जनतेच्या 12 कोटी 73 लाख रुपयांचा चुराडा महायुती सरकार करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
काही तासांच्या कार्यक्रमासाठी खर्च केलेल्या इतक्या सरकारी निधीत यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब पुन्हा… pic.twitter.com/bBmVqYcn81
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 28, 2024
READ ALSO :
हेही वाचा..“ओबीसी आणि मुस्लिम एकत्र झाले तर आपण 48 पैकी 48 जागा जिंकु”, कुणी केला ‘हा’ मोठा दावा ? राज्यात तिसरी आघाडी ?
हेही वाचा…वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक, शिरूरची जागा राष्ट्रवादीच लढणार, महायुतीचा उमेदवार कोण ?
हेही वाचा…“मनोज जरांगेंना तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का ?” उद्धव ठाकरेंचा सरकारला खोचक सवाल
हेही वाचा…“अंतरवाली सराटीच्या दंगलीत टोपेंच्या कारखान्यातून दगडं आणलीत,” भाजपचा आरोप, राजेश टोपेंची प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा“फसव्या घोषणा अन् पोकळ आश्वासनांची रेलचेल, अर्थसंकल्प म्हणजे शिळ्या कडीला उत आणणारा “