पुणे : येणारी निवडणूक पक्षाची नाही तर आपली स्वत: ची आहे. इथे सत्तेवर कोणाला बसवायचे याची निवडणूक नाही तर या ठिकाणी आपले अधिकार हे शाबूत ठेवण्यासाठी ही लढाई आहे. उद्याची व्यवस्था काय असेल याची चुणूक या सरकारने दाखवली आहे. त्यामुळे ओबीसी आणि मुस्लिम एकत्र आले तर आपण ४८ पैकी ४८ जागा जिंकू असा दावा वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला. काल पुण्यात वंचितची सत्ता परिवर्तन सभा पार पडली. या सभेतून प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुक आणि मराठा आरक्षणावर प्रखड भाष्य केले.
हेही वाचा…शिंदेंचा ‘हा’ माजी खासदार अजित पवार गटात करणार प्रवेश, कोल्हेंच्या विरोधात महायुतीची रणनिती ठरली ?
मार्च महिन्यांत निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. आपल्याला आपल्या समोरचं लक्ष कायम ठेवलं पाहिजे ते म्हणजे पुन्हा आरएसएस भाजपचे सरकार केंद्रात सत्तेत येणार नाही ही दक्षता आपण घेतली पाहिजे. उद्या युती होईल न होईल सांगता येत नाही. व्हायला पाहिजे अशी आपली इच्छा आहे. पण आपल्या इच्छेचं काय करणार ? कारण मोदी हा रिंगमास्टर बसलेला आहे. त्या रिंगमास्टरने जेलमध्ये जावं लागेल म्हटलं. तर हा म्हणतो मी तुझ्याच जेलमध्ये येतो कशाला जेलमध्ये घालवतो अशा घटना घडतील. असा अंदाज देखील आंबेडकरांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा…पुणेकरांना हवा ‘व्हिजनरी’ खासदार, कोण असेल नागरिकांच्या पसंतीचा उमेदवार ; हे मुद्दे लक्षात घ्या
मुस्लिम समाज स्वत: ची सुरक्षितता राजकीय पक्षांत शोधतो. त्यांना सांगतो की राजकीय तुम्हाला सुरक्षा देणार नाहीत. तुम्ही या वंचितांच्या सभेत आणि आंदोलनात सहभागी झाल. तर तिथेच त्याला सुरक्षितता मिळेल हे लक्षात घ्या. असेही त्यांनी सांगितले. तर जरांगे पाटलांना देखील त्यांनी सल्ला दिला. अण्णा पाटलांचे आंदोलन आपण याआधी पाहिलं आहे. आता उभे केलेले जरांगे पाटलांचं आंदोलन जिरवायचे नसेल तर तुम्हाला निवडणुकीत उभे राहिल्याशिवाय पर्याय नाही. निवडणुकीत उभे राहिला नाहीत तर इथला निजामी मराठा तुम्हाला कधी संपवेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. कारण गरिबांच्या चळवळी कधीच उभ्या राहू दिल्या नाहीत. आपण गरिबांच्या आणि उपेक्षितांच्या चळवळी उभ्या करत आहोत या चळवळीमध्येच एकजुट होणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक, शिरूरची जागा राष्ट्रवादीच लढणार, महायुतीचा उमेदवार कोण ?
हेही वाचा…“मनोज जरांगेंना तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का ?” उद्धव ठाकरेंचा सरकारला खोचक सवाल
हेही वाचा…“अंतरवाली सराटीच्या दंगलीत टोपेंच्या कारखान्यातून दगडं आणलीत,” भाजपचा आरोप, राजेश टोपेंची प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा“फसव्या घोषणा अन् पोकळ आश्वासनांची रेलचेल, अर्थसंकल्प म्हणजे शिळ्या कडीला उत आणणारा “
हेही वाचाजनतेला वेड्यात काढण्याचा महायुतीचं कामं, आधी आंतरवाली सराटीच्या लाठीचार्जची SIT चौकशी करा, मग..