पुणे : गेल्या काही दिवसापासून शिरूर लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणुक लढणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महायुतीकडून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुक लढण्यासाठी इच्छूक आहेत. परंतु शिरूरची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाची असल्याने महायुतीकडून अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. यातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी शिवाजीराव आढळराव पाटलांसह शिरूर मतदारसंघातील अनेक नेत्यांना बोलवण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…पुणेकरांना हवा ‘व्हिजनरी’ खासदार, कोण असेल नागरिकांच्या पसंतीचा उमेदवार ; हे मुद्दे लक्षात घ्या
आता शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. या बैठकीला शिवाजीराव आढळराव पाटलांसह जुन्नर तालुक्यातील नेतेमंडळीचीही वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. यात काही वेळ आढळराव पाटलांना बाहेर ठेऊन शिंदे यांनी दिलीप वळसे पाटील, आणि अजित पवार यांच्याशी चर्चा केली. तसेच यानंतर आढळराव पाटील वर्षा बंगल्यावरून आपल्या सहकाऱ्यांसोबत बाहेर पडले असता. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…अटल सेतू, कोस्टर रोड, ते मिहान प्रकल्प, अजितदादांनी काय काय घोषणा केल्या ?
कर्जत येथील मेळाव्यात जाहीर विधान केल्यानंतर अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष केंद्रीत केलं. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून शिरूर लोकसभा मतदारसंघात सातत्याने दौरे केले जात आहेत. यातच सध्या शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील, तसेच भाजपचे प्रदीप कंद आणि अजित पवार गटाकडून विलास लांडे निवडणुक लढण्यास इच्छूक आहेत. दोन टर्म खासदार असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांना पुणे म्हाडा अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांचा पत्ता कट होणार अशा चर्चा देखील रंगल्या आहेत.
परंतु दुसऱ्या बाजूला शिरूरची जागा राष्ट्रवादीकडेच राहण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटलांनी अजित पवार गटात प्रवेश करावा आणि निवडणुक लढवावी, असा सुर देखील राष्ट्रवादी आणि महायुतीत बघायला मिळत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात कागदावर राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद अधिक दिसून येतेय. परंतु विद्यमान अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटलीच ठक्कर फाईट देऊ शकतात. अशी चर्चा देखील राष्ट्रवादीच्या गोटात सुरू झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मनोज जरांगेंना तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का ?” उद्धव ठाकरेंचा सरकारला खोचक सवाल
हेही वाचा…“अंतरवाली सराटीच्या दंगलीत टोपेंच्या कारखान्यातून दगडं आणलीत,” भाजपचा आरोप, राजेश टोपेंची प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा“फसव्या घोषणा अन् पोकळ आश्वासनांची रेलचेल, अर्थसंकल्प म्हणजे शिळ्या कडीला उत आणणारा “
हेही वाचाजनतेला वेड्यात काढण्याचा महायुतीचं कामं, आधी आंतरवाली सराटीच्या लाठीचार्जची SIT चौकशी करा, मग..
हेही वाचा…शिंदेंचा ‘हा’ माजी खासदार अजित पवार गटात करणार प्रवेश, कोल्हेंच्या विरोधात महायुतीची रणनिती ठरली ?