मुंबई : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी भाजप आमदारांनी केली आहे. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी होईल, असे त्यांनी सभागृहात सांगितले. त्यावरून राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारवर कडाडून टिका केली तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावरून मनोज जरांगेंना तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का ? असा खोचक सवाल केला.
हेही वाचा…अटल सेतू, कोस्टर रोड, ते मिहान प्रकल्प, अजितदादांनी काय काय घोषणा केल्या ?
मनोज जरांगेंच्या मागे लागण्यापेक्षा त्यांच्या मागण्यांच्या मागे लागा. आम्ही त्यांच्या मागे आहोत असा आरोप करत असाल तर एक ते दीड महिन्यापुर्वी कुणी गुलाल उधळला होता ? फटाके कुणी फोडले होते ? जर तुम्ही त्यांची एसआयटी लावणार असाल तर चिवटपणाने चौकशी करा. मध्येच सोडून देऊ नका. असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला लगावला.
हेही वाचा…जागावाटपाचा मुद्दा महायुतीत ठरणार कळीचा , शिंदे गट १८ जागांवर आग्रही तरअजितदादांकडून अधिकच्या जागांची मागणी
दरम्यान, आज मनोज जरांगे यांनी जे आंदोलन सुरू केलं आहे. त्याची एसआयटी चौकशी करण्याचाही ठराव झाला. ही एसआयटी चौकशी सरकारने चिवटपणे करावी. त्यात कोण कोण आहेत ? कुणाला कुणाचे फोन जात होते ते तपासलं पाहिजे. तसंच रश्मी शुक्ला यांना जर आता मुदतवाढ दिली आहे तर मनोज जरांगेंच्या फोनवर कुणाचे फोन आले ते त्यांना माहीत असेल असेही ठाकरे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“अंतरवाली सराटीच्या दंगलीत टोपेंच्या कारखान्यातून दगडं आणलीत,” भाजपचा आरोप, राजेश टोपेंची प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा“फसव्या घोषणा अन् पोकळ आश्वासनांची रेलचेल, अर्थसंकल्प म्हणजे शिळ्या कडीला उत आणणारा “
हेही वाचाजनतेला वेड्यात काढण्याचा महायुतीचं कामं, आधी आंतरवाली सराटीच्या लाठीचार्जची SIT चौकशी करा, मग..
हेही वाचा…शिंदेंचा ‘हा’ माजी खासदार अजित पवार गटात करणार प्रवेश, कोल्हेंच्या विरोधात महायुतीची रणनिती ठरली ?
हेही वाचा…पुणेकरांना हवा ‘व्हिजनरी’ खासदार, कोण असेल नागरिकांच्या पसंतीचा उमेदवार ; हे मुद्दे लक्षात घ्या