मुंबई : सरकार पाडण्याचा या अगोदर भाजपने तीनदा प्रयत्न केला होता. ज्यावेळी 2019 च्या विधान सभा निवडणुकीच्या वेळी काही राष्ट्रवादी काॅंग्रेसचे काही आमदारांनी भाजपने बाहेरच्या राज्यात ठेवले होते. मात्र त्यानंतर ते परत महाराष्ट्रात आले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन केली. सरकार स्थापन झाल्यानंतर दीड वर्ष व्यवस्थित चाललं, मात्र पुन्हा एकदा भाजपने हा डाव केला आहे. असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
आघाडीत मोठा भुकंप; एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे 13 पेक्षा अधिक आमदार नॉट रिचेबल
विधान परिषदेच्या निवडणुकीत पुरेसं संख्याबळ नसतानाही भाजपने आपला उमेदवार निवडून आणला आहे. त्याचा परिणाम म्हणून महाविकास आघाडीतील एक उमेदवार पराभूत झाला आहे. त्यामुळे कोणीही नाराज नाही, महाराष्ट्रात जाऊन सगळ्यांची चर्चा करणार असल्याचं शरद पवारांनी सांगितले. मोठ्या पदावर कुणाला संधी द्यायची हा मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तो अधिकार आहे. असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादीची पहिल्या पंसतीची मते निंबाळकर यांना, खडसेंना दुसऱ्या पसंतीची मते
महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी शिवसेनेकडे असून उपमुख्यमंत्रीपद हा राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे आहे. त्यामुळे याची सगळी जबाबदारी ही शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्याकडे असून उद्धव ठाकरे जे काही निर्णय घेतील, त्यांच्यासोबत राष्ट्रवादी असणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीप्रमाणे कित्येक वेळा क्राॅस मतदान केलं जातंय. परंतु पुढे सरकार व्यवस्थित चालतंय, असंही शरद पवार म्हणाले.
देश वेठीस धरण्यासाठी विरोधकांची धंदेवाईक दलालांशी हातमिळवणी! गोपीचंद पडळकर यांचा आरोप
दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीसमोर मोठं संकट उभे राहिले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 35 आमदार हे सुरतमध्ये असल्याची माहिती समोर येत असून सायंकाळी एकनाथ शिंदे भाजपचे अध्यक्ष जे, पी, नड्डा आणि अमित शहा यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Read also:
- फडणवीसांना मुख्यमंत्री पद, शिंदेना उपमुख्यमंत्री; राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसची साथ नकोच; एकनाथ शिंदेनी घातल्या अटी
- “सत्ता येते जाते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही;” राज ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत
- एकनाथ शिंदे यांच्यासोबत सेनेसह एकूण 35 आमदार; वाचा संपुर्ण यादी
- “शाब्बास एकनाथजी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”
- “एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे सर्व आमदार संपर्कात, भाजपचा डाव यशस्वी होणार नाही”