अहमदनगर : गोदावरी कालव्यांवरील जीर्ण बांधकामे नव्याने बांधण्यासाठी चाळीस कोटी रुपयांच्या खर्चास जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मान्यता दिली आहे. सदरील प्रशासकीय मान्यता ही कालवे रुंदीकरणाची फक्त सुरुवात आहे. आणखी ४४ कोटी रुपयांच्या खर्चास लवकरच मान्यता मिळणार आहे. गोदावरी कालव्यांच्या शेवटच्या टोकांपर्यंत पूर्ण दाबाने पाणी पोहोचविण्याच्या दृष्टीने उचलण्यात आलेले हे महत्वाचे पाऊल आहे असे स्पष्टीकरण आमदार आशुतोष काळे यांनी दिले आहे.
हे पण वाचा, खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थित नागपूर येथे असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
गोदावरी कालव्यांच्या बाबतीत प्रलंबित असलेले काम हे बारा वर्षांपासून रखडलेले होते. आमदार आशुतोष काळे यांनी आमदार होताच या संदर्भात पाठपुरावा करून काम मंजूर करून आणले. त्याबदल लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने राजेंद्र बावके, रावसाहेब गाढवे, महेंद्र शेळके आणि गौतम बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब कोते यांच्या हस्ते पेढा भरवून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. काळे म्हणाले वहनक्षमता कमी झाल्याने उजवा कालवा सव्वाचारशे क्युसेकने वेगाने वाहतो आणि आता त्याची क्षमता सव्वासातशे क्युसेक्स तर डावा कालवा तीनशे क्युसेक्सने वाहतो आणि तो कालवा आता सव्वाचारशे क्युसेक्स करायची आहे.
हे पण वाचा, साई संस्थानाच्या अध्यक्षपदाबाबतीत सत्यजित तांबे व आशुतोष काळे यांच्या नावासाठी मुबंईत खलबतं
पहिल्या टप्प्यातील २२ जीर्ण बांधकामे पूर्ण करण्यासाठी चाळीस कोटी रुपये खर्चाला मान्यता मिळाली आहे. उर्वरित बांधकामे पूर्ण कामे करण्यासाठी आणखी ४४ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता मिळणार आहे. दर्जेदार कामे होण्यासाठी आपण नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. वेगाने मातीकाम पूर्ण करण्यासाठी कालव्यांची वहनक्षमता वाढविणे शक्य होईल. गोदावरी कालव्यांच्या दृष्टीने हा क्रांतिकारक निर्णय जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आला आहे. ओव्हर फ्लोचे जास्तीत जास्त पाणी लाभक्षेत्रात जिरविणे व साठविणे शक्य होणार आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
Read Also :
- हे जेनतेच्या हिताच सरकार आहे की तमाशा आहे? – देवेंद्र फडणवीस
- “राष्ट्रमंच’ हा केवळ बातमीत राहण्यापुरता केलेला केविलवाणा आणि नवा हास्यास्पद प्रयोग”
- अहमदनगर महापालिका महापौर निवडणुकीत शिवसेना ‘गॅसवर’ तर काँग्रेस ‘फ्रंटफूटवर’
- अहमदनगरच्या महापौर पदासाठी शिवसेना खासदार सुजय विखेंच्या दारी
- निवडणुकीत पत्ता कट केलेल्या भाजपच्या मेधा कुलकर्णींचे अखेर राजकीय पुनर्वसन