अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ नुकताच आता संपणार आहे. महापौर पद रिक्त होत असल्याने पुन्हा एकदा आता पालिकेत राजकीय युद्ध बघायला मिळणार आहे. अहमदनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा मोठा दबदबा आहे. आमदार जगताप आणि नगर शहर शिवसेनेमध्ये मोठा राजकीय विरोध आहे. अहमदनगरच्या महापौर पदाची निवडणूक आता येत्या पंधरवाड्यात कधीही होऊ शकते. आमदार संग्राम जगताप कोणती राजकीय खेळी खेळतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
हे पण वाचा, अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा फडकणारच ; संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांचा निर्वाळा
अहमदनगर महापालिकेच्या महापौर पदासाठी नगरचे राजकारण आता चांगलेच तापू लागले आहे. विध्यमं महापौर बाबासाहेब वाकळे यांची मुदत ३० जूनला संपत असल्याने कोणत्याही क्षणी महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी येत्या काही दिवसांमध्ये निर्णय घ्यावाच लागणार आहे. अहमदनगरमध्ये सध्या राष्ट्रवादीच्या पाठींब्याने भारतीय जनता पक्षाचा महापौर झाला होता आणि सर्वाधिक २४ नगरसेवक असणाऱ्या शिवसेनेला दूर ठेवण्यात आले होते. यावेळी अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला आरक्षण महापौर पदासाठी राखीव झाले आहे.
भारतीय जनता पक्षाकडे एकही उमेदवार नसल्याने त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे आणि तसे खासदार सुजय विखे आणि शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी स्पष्ट केले आहे. कमी जागा असतानाही काँग्रेसने महापौर पदासाठी दावा केला आहे. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार पती दीप चव्हाण यांचा राष्ट्रवादी पक्षाच्या आमदार संग्राम जगताप यांच्या सोबत वावर वाढला असल्याने शिवसेना आता गॅसवर आहे. नगर शहर शिवसेनकडून २४ नगरसेवक दगाफटका होऊ नये यासाठी आतापासूनच अज्ञात स्थळी हलविण्यात आले आहेत. आता महापौर नेमका काँग्रेसचा होणार की शिवसेनेचा वाघ बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read Also :
- अहमदनगरच्या महापौर पदासाठी शिवसेना खासदार सुजय विखेंच्या दारी
- निवडणुकीत पत्ता कट केलेल्या भाजपच्या मेधा कुलकर्णींचे अखेर राजकीय पुनर्वसन
- “कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता एकतर्फी होणार”, डॉ. अतुल भोसलेंची वाळव्यात गर्जना
- राज्यात मांडीला मांडी, पण दिल्लीत पवारांच्या बैठकीला दांडी; संजय राऊत म्हणतात…
- संघ भाजपच्या बैठका; योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात भाजप आमदाराची नाराजी