मुंबई : महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय व इतर सर्व विकासकामांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती. यामध्ये अनेक महत्वाच्या विकासकामांचा समावेश होता. यातच आता उच्च न्यायालयाने यापूर्वीच्या याचिकांमध्ये निर्णय देताना राज्य सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. यातच आता उच्च न्यायालयासमोर उर्वरित प्रलंबित याचिकांमध्ये राज्य सरकारने स्वत:हून सर्व स्थगिती सरसकट उठवली आहे. यावरून आता राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर जोरदार घणाघात करत न्यायालयाचे आभार मानले आहे.
हेही वाचा…आली समीप घटिका..! एकनाथ शिंदें दिल्लीला तात्काळ रवाना
आम्ही न्यायालयात गेलो नसतो तर राज्य सरकारने ही स्थगिती कधीच उठवली नसती. राज्य सरकारने स्थगिती उठवलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करतील अशी आशा करतो. लोकांच्या विकासासाठी आम्ही सत्तेत आलो असा कांगावा करणाऱ्यांना ही मोठी चपराक आहे. सत्तेत आल्यानंतर सुरू असलेल्या सर्व कामांना स्थगिती देऊन शिंदे फडणवीस सरकार नक्की कोणाची प्रगती करणार होते? महाविकास आघाडीसाठी मात्र महाराष्ट्राचा विकास हाच ध्यास होता आणि आहे. असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…शरद पवार गटाकडून ‘हा’ बडा वकिल युक्तिवाद करणार, शरद पवारांची रणनीती तयार
दरम्यान, पुढे जनतेचे न्यायालय आहे, तिथे शिंदे- फडणवीस सरकारला आल्या पावली परत जावे लागेल हे नक्की आहे. राज्यातील विकास कामांना स्थगिती देण्यार्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून दाखल करण्यात आलेल्या याचिकांची मुंबई उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली होती. सुनावणी करताना न्यायालयाने सरकारची अत्यंत कठोर शब्दात कानउघडणी केली. न्यायालयाचा आणि जनतेचा रोष पाहून शेवटी सरकारने दिलेली स्थगिती मागे घेतली आहे. न्यायालयामुळे या सरकारला आपली मनमानी करता आली नाही आणि त्यांना काही पाऊले आज मागे घ्यावी लागली. पुढे जनतेच न्यायालय आहे, तिथे यांना आल्या पावली परत जावे लागेल हे नक्की.
महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय व इतर सर्व विकासकामांना शिंदे फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती. यामध्ये अगदी गावाच्या छोट्या पाणंद रस्त्यापासून ते राज्य महामार्ग, शासकीय इमारती अशा शेकडो प्रकारच्या महत्त्वाच्या विकासकामांचा समावेश होता.
उच्च न्यायालयाने…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 5, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“पुण्यात माजी नगरसेविकेवर बलात्कार, दोषी नराधमांवर कठोर कारवाई करा,” राष्ट्रवादीची मागणी
हेही वाचा…“आधी महत्वाची खाती काढली अन् आता पुण्याचं पालकमंत्री, चंद्रकांत दादांचं डीमोशन बघवत नाही हो ,”
हेही वाचा…“भाजप मित्र म्हणून जवळ घेतो आणि अफजल खानासारखी मिठी मारतो”, मित्र पक्षाचा गंभीर आरोप
हेही वाचा… रोहित पवारांच्या ‘युवा संघर्ष यात्रे’ने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणणार, १३ जिल्ह्यातून जाणारी यात्रा भाजपच्या महाविजय २०२४ ला खिंडार पाडत जाणार
हेही वाचा…“५६ वर्षात शरद पवार एकही निवडणुक हरले नाहीत, ” सुप्रिया सुळेंनी सांगितलं रहस्य, म्हणाल्या..,