पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अखेर सात वर्षांनी बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली. पुण्यात तळेगाव आणि आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी घाटात 1 जानेवारीला भिर्रर्र..आवाज घुमणार होता. बैलगाडा शर्यतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनीही सशर्त परवनगी दिली होती. मात्र कोरोना विषाणू आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आज रात्री पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे बैलगाडा शर्यतीलाही पुन्हा ब्रेक लागला आहे. परवानगी मिळाल्याने एकीकडे उत्साहाचे वातावरण पहायला मिळत असताना दुसरीकडे नाराजीचा सुर देखील उमटत असताना दिसून येत आहे.
आमच्या कार्यकर्त्याला कोंडीत पकडल्यावर तो ‘म्याव-म्याव’ करत नाही तर ‘डरकाळी’ फोडतो – भाजप
त्यातच आता ऱाष्ट्रवादीच्या नेत्याने युवा पिढीबाबत मोठी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, बैलगाडा शर्यत चालू होत असताना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटी,शर्थी यांची पायमल्ली होणार नाही याची काळजी बैलगाडा मालक आणि आयोजक यांनी घेण्याचे आवाहन केलं जात आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीस सशर्त परवानगी दिल्या नंतर राजकीय श्रेयवादाची लढाई देखील पाहायला मिळाली होती. शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा आदी पक्षांच्या नेत्यांनी काही प्रमाणात श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. यानंतर आता शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी तर तळेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने 1 जानेवारीला नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे.
नांगरे पाटील आणि भरत आंधळे यांच्या भाषणांमुळे जसा चांगल्या युवकांचा एक वर्ग वाया गेला तसाच एक वर्ग बैलगाडा शर्यतींमुळे वाया जाणार असं दिसतंय.
— Adv. Bhushan Raut – अॅड. भूषण राऊत (@AdvBhushanRaut) December 30, 2021
या शर्यतीसाठी लाखो रुपयांची बक्षीसेही जाहिर करण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर, बैलगाडा घाट शर्यतीसाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान, एका बाजूला राष्ट्रवादीचे नेतेच या शर्यतीचे आयोजन करत असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते भूषण राऊत यांनी केलेले एक ट्वीट सध्या बरेच चर्चेत आलेआहे. ते म्हणाले, नांगरे पाटील आणि भरत आंधळे यांच्या भाषणांमुळे जसा चांगल्या युवकांचा एक वर्ग वाया गेला तसाच एक वर्ग बैलगाडा शर्यतींमुळे वाया जाणार असं दिसतंय असं राऊत यांनी म्हटले आहे.
Read also:
- दिलीपराव देशमुखांचा हट्ट पुतण्याने पुरवला; लातूरच्या शेतकऱ्यांना ५ लाख रुपये पर्यंत पीक कर्ज शून्य टक्के दराने मिळणार
- पक्षातील विरोधकांना धडा शिकवणार; नाना पटोलेंचा काँग्रेस नेत्यांना थेट इशारा
- …तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावालाच लागेल; मंत्री विजय वडेट्टीवार यांचा गंभीर इशारा
- तू आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलंस, मी आंघोळ करता करता थांबलो – नारायण राणे
- ‘राजन तेली यांची मोठी मेहनत, खचू नका, जोमानं कामाला लागा‘, फडणवीसांचा सल्ला