नाशिक : 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समोरोप प्रसंगी भाषण करताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी कंगणा रनौतसह विक्रम गोखलेंवरती निशाना साधतच साहित्यिकांच्या भूमिकेबाबत खंत व्यक्त केली.
बच्चू कडू वादात; बोगस कागदपत्र आणि भ्रष्टाचाराप्रकरणी तक्रार दाखल
थोरात म्हणाले, ‘स्वातंत्र्याची ज्योत गांधींनी आणि टिळकांनी लिखाणातून दिली. स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास कोणी पुसू शकत नाही. मात्र एक बाई या स्वातंत्र्याला त्याला भीक म्हणते आणि त्या बाईच्या वक्तव्याला महाराष्ट्रातील एक कलाकार समर्थन देतो मात्र यावरती कोणी साहित्यिक बोललं नाही याचं वाईट वाटलं अशी खंत बाळासाहेब थोरात यांनी या साहित्यिकांच्या समोर बोलून दाखवली.
लहू बालवडकर “फस्ट एड पॉलिक्लिनिक” आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
तसेच या संमेलनाची सुंदर साहित्य संमेलन म्हणून नोंद होईल. देशात व देशाबाहेर साहित्य संमेलन जाऊन पोहोचलय. नाशिकच्या मातीला साहित्याचा इतिहास संतांची परंपरा पुढे नेण्याचं काम गोदाच्या पाण्यात आणि नाशिकच्या मातीत आहे. लेखकांची ताकद मोठी असते, म्हणून जिथं चुकत तिथे लेखकांनी लिहिलं पाहिजे. राजकारण बदलवण्याची ताकद लेखकांमध्ये असते. भारतात चुकीचं घडत असेल तर लेखकांनी Author जागरूक राहिले पाहिजे त्यावर लिहिलं पाहिजे. कट्टरवाद वाढला आणि त्यातून मते मिळवायचे असे सध्या सुरू आहे. राज्यघटनेप्रमाणे देश चालला पाहिजे यासाठी राजकारणी काम करतात मात्र आम्ही जिथं कमी पडत असू तिथं लेखकांनी लिहिलं पाहिजे असही थोरात आपल्या भाषणामध्ये म्हणाले.
Read Also :
- लोकप्रियतेमुळे नव्हे, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे तुम्ही खासदार; मोहितेंनी कोल्हेंना खडेबोल सुनावले
- भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंच्या अडचणीत वाढ; काँग्रेसच्या छोटू भोयर यांची निवडणुक आयोगाकडे तक्रार
- ओमिक्रॉनचं महाराष्ट्रात पाऊल; अकोला जिल्ह्यात जमावबंदी लागू
- “बिनडोक लोक सत्तेत बसल्यावर आणखी काय अपेक्षा करणार”
- “बिनडोक लोक सत्तेत बसल्यावर आणखी काय अपेक्षा करणार”