नवी दिल्ली : केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुकांसंदर्भातील हालचाली आता गतीमान झाल्या आहेत. केंद्र सरकारने सगळ्या राजकीय पक्षांची एक बैठक बोलावली आहे. ही बैठक २४ जून रोजी होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० ला रद्दबातल ठरवण्यात आलं होतं. यानुसार जम्मू-काश्मीरचा असलेला विशेष दर्जा संपुष्टात आणण्यात आला होता. यासोबतच जम्मू-काश्मीरचे विभाजन दोन केंद्र शासित प्रदेशांमध्ये करण्याची घोषणा करण्यात आली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच या प्रकारची होणारी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या सर्वपक्षीय बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच इतर अनेक केंद्रीय नेते समाविष्ट होण्याची शक्यता आहे.
Prime Minister Narendra Modi likely to chair an all-party meet with leaders of Jammu and Kashmir next week: Sources
(File pic) pic.twitter.com/MdL6NUgM1o
— ANI (@ANI) June 19, 2021
केंद्र सरकारने नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुक अब्दुल्ला, पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती, जम्मू-काश्मीर अपनी पार्टी (JKAP) चे अल्ताफ बुखारी आणि पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख सज्जाद लोन यांना चर्चा करण्यासाठी आमंत्रण देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टी (PDP)चे अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलंय की, होय मला फोन आला होता मात्र, अधिकृत निमंत्रण आलेलं नाही. आम्ही उद्या यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेऊ की या बैठकीत सामील व्हायचं की नाही.
केंद्राशी चर्चेच्या शक्यतेबाबत विचारले असता माकपचे नेते आणि पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लेरेशन (पीएजीडी) चे प्रवक्ते एम.वाय. तारिगामी म्हणाल्या, “आम्ही केंद्राशी चर्चेसाठी आमची दारे कधीच बंद केलेली नाहीयेत. अद्याप तरी मला कोणत्याही प्रकारच्या बैठकीची माहिती नाही, मात्र जर तसे काही झाले तर ते स्वागतार्हच आहे.
Yes, I've received a call but not a formal invitation yet. I'm holding a PAC meeting tomorrow to discuss the same & take a decision on whether to participate or not in the meeting: PDP President & J&K ex-CM, Mehbooba Mufti on PM likely to chair an all-party meet with J&K leaders pic.twitter.com/WxrgtpcO60
— ANI (@ANI) June 19, 2021
Read Also :
- रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झडती घेणाऱ्या पाचही पोलिसांचे निलंबन मागे, गृहमंत्रालयाचे आदेश
- “अजित पवारांकडे १० सेकंद थांबून विचारपूस करायला देखील माणुसकी शिल्लक नाही”
- “आम्ही मराठी माणसाचा विषय कधीच सोडला नाही, त्यामुळे शिवसेना मराठी माणसाच्या मनात”
- भाजप-शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरूच, निलेश राणेंनी काढली शिवसेनेची लायकी, म्हणाले…
- मोदीनंतर उद्धव ठाकरे हाच एकमेव भारताला पर्याय – संजय राऊत