मुंबई : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहेत. यातच आता ठाकरे गटातील नेत्यांचं शिष्ठमंडळ राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी या प्रकरणात दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
हेही वाचा…शरद पवारानंतर ठाकरेंची तोफ जळगावात धडाडणार, आगामी काळात सभांचा पाऊस पडणार
वटहुकूम काढून मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या, अशी मागणी ठाकरे गटातील नेत्यांनी राज्यपालांकडे केली. तसेच या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केलीय. सरकार आपल्या दारी कार्यक्रमाला घ्यायचा आहे, त्यामुळे सरकारने लाठीचार्ज केला असल्याचाही आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीमधीलच आदेश देणारे खरे जनरल डायर कोण ? असा सवाल देखील त्यांनी केला.
हेही वाचा…शरद पवारांची ताकद वाढली, माजी आमदाराचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश, विरोधकांना बसला धसका
दरम्यान, या प्रकरणावरून लाठीचार्जचा आदेश देण्याचा अधिकार मला नसून तेथील एसपीला आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तर मी जर आदेश दिले असतील, हे विरोधकांनी सिद्ध केले तर राजकारण सोडून देईन, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. तर या प्रकरणाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माफी मागितली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आता पंतप्रधानांना संबोधित करताना प्राईम मिनिस्टर ऑफ बीजेपी असं म्हणायचं का ?” बड्या खासदाराचा सवाल
हेही वाचा…अबब..! इंडिया नाव भारत करण्यासाठी ‘इतके’ कोटी खर्च होणार, आकडा ऐकून थक्क व्हाल
हेही वाचा…“माझे बाबा हट्टी, बाबांच्या जिवाचं काही बरं वाईट झालं तर..,” जरांगे पाटलांच्या मुलीने सरकारला दिला इशारा
हेही वाचा…राज्यात काका-पुतण्याचा आणखी एक संघर्ष, काका अजित पवारांवर ‘या’ पुतण्याची पहिल्यांदाच टिका
हेही वाचा…“भाजपची ही दादागिरी, सत्तेची मस्ती आणि मुस्कटदाबी अती होतंय”, सोमय्यांचा व्हिडीओ दाखवणाऱ्या संपादकावर गुन्हा दाखल