मुंबई : शिवाजी पार्क याठिकाणी दसरा मेळावा नेमका एकनाथ शिंदे कि उद्धव ठाकरे घेणार? यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष बघायला मिळत आहे. दोन्ही बाजूंनी आम्हीच शिवसेनेचा दसरा मेळावा घेणार असल्याचे दावे प्रतिदावे करीत आहेत. दोन्ही बाजूंनी मैदान मिळवण्यासाठी महापालिकेला अर्ज देखील केलं आहे. यावर आता शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“माझी अक्कल काढली, तरी मला फारसं वाईट वाटत नाही”; पेडणेकरांना बावनकुळेंचं प्रत्युत्तर
दसरा मेळावा बीकेसी येथे आयोजित करण्यात यावा यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याकडून एमएमआरडीए ला पत्र लिहिण्यात आलं आहे. एमएमआरडीए ही सरकारी यंत्रणा नगर विकास खात्याच्या अंतर्गत येते. याआधी शिवाजी पार्क मैदानासाठी देखील शिवसेनेकडून पत्र लिहिण्यात आलं होतं. आता बीकेसी मैदानासाठी देखील शिवसेना खासदार अरविंद सांवत यांनी पत्र लिहिलं आहे. शिवसेनेच्या विचारांचं सोनं कुठे लुटलं जाणार? हे लवकरच कळेल असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
सेनेची जागा आता भाजप घेणार..! रिक्त झालेल्या जागेवर भाजपचा दावा, सेना-भाजपमध्ये रस्सीखेस
त्याचबरोबर वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात गेल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. आमच्याशी जशी गद्दारी केली तशीच गद्दारी तरूणांशी केली आहे. नाणारची आमची भूमिका स्पष्ट आहे. स्थानिकांना जे मान्य असेल ते आम्हाला मान्य आहे. असं देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. वेदांता फॉक्सकॉन या कंपनीबद्दल महाविकास आघाडीने 6 महिन्यात फक्त बैठका घेतल्या. ही कंपनी येणार नाही हे जानेवारी 2020 मध्ये स्पष्ट झाले होते. असा खुलासा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
Read also
- “देवाचा कौल घेऊन भाजपात प्रवेश केला”; गोव्यातील काॅंग्रेस आमदाराचं वक्तव्य
- “मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या पत्राचा विचार करावा”; सुप्रिया सुळे
- “ही वेळ ‘एकदम ओक्के’ म्हणण्याची नसून कृती करण्याची आहे”; राष्ट्रवादीने शिंदेंना फटकारलं
- “काँग्रेसने भारत जोडो यात्रा सुरू केली, मात्र गोव्यात काँग्रेस छाडो यात्रा सुरू झाली आहे”; प्रमोद सावंत
- “लक्षात ठेवा…! राज्यात अस्सल हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे”; तुषार भोसले