मुंबई : उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचं नेतृत्व स्विकारलं आहे. त्यांनी जर बाळासाहेबांच्या विचारांचं नेतृत्वा स्विकारलं असतं त्यांना मी शिवसेना प्रमुख म्हणूनच वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या असत्या. उद्धव ठाकरे सध्या शरद पवारांच्या मांडीवर बसून काम करीत आहेत. बाळासाहेबांच्या पाठिंत खंजिर खुपसण्याचा काम त्यांच्याकडून दुर्दैवाने झाले आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांची हाकालपट्टी केली आहे. फक्त भावनांसोबत खेळण्याचा काम त्यांनी केला आहे. असा आरोप शिवसेनेचे नेते आणि बंडखोर आमदार रामदास कदम यांनी केला आहे.
“काय ती जनहिताची उत्तरे, काय ती मुलाखत, एकदम ओक्के”; काॅंग्रेसने पुन्हा एकदा डिवचलं
जेव्हा वेळ होती, त्यावेळी त्यांनी आम्हाला वेळ दिला नाही आणि आता वेळ आली आहे तर सगळ्यांसाठी त्यांनी मातोश्री, शिवसेना भवनाचे दरवाजे उघडे केले आहेत. कालची मुलाखत पाहिली तर उंदराला मांजर साक्षीदार अशा पद्धतीची होती. त्यामुळे संजय राऊत हे प्रश्न विचारण आणि त्यावर उद्धव ठाकरे हे उत्तर देणार. शिवसेना जर बाळासाहेबांची आई होती. तर त्यांच्या गद्दारी कुणी केली? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
“काय ती जनहिताची उत्तरे, काय ती मुलाखत, एकदम ओक्के”; काॅंग्रेसने पुन्हा एकदा डिवचलं
शिवसेनेमध्ये अनेकांच्या हत्या करण्यात आल्या. अनेक जण तुरूंगात गेले. अनेक जणांना मोठ्या संकंटाचा सामाना करावा लागला. तसेच तुमच्या आदित्य ठाकरेंचं योगदान काय आहे? असा थेट सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच तो सध्या आमदार खासदारांना देखील बघत नाही. त्यांनी तर माझंच खातं संभाळलं होतं. प्लाॅस्टिक बंदी मी केली आणि तो म्हणतो की मी केली आहे. दुसऱ्यांनी केलेल्या कामांचं श्रेय किती घ्यावं. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांकडून मोठं गिप्ट; सदस्य नोंदणीचे अर्ज अन् शपथपत्राचे मोठे गठ्ठे भेट
पालापाचोळा कुणाचा झाला आहे. कुणाला पक्षातून हाकालपट्ट्या कराव्या लागत आहेत. तसेच उद्धव ठाकरेंना मराठा समाज्याच्या नेत्यांना मोठं होऊ द्यायचं नाही. नारायण राणे, एकनाथ शिंदे रामदास कदम ही त्याची उदरणे आहेत. कुठल्याही नेत्याला ते मोठं होऊ देत नाही. अशी भूमिका उद्धव ठाकरे यांची आहे. असा सवाल आहे. तसेच तीन तीन वर्ष मला बोलू दिलं नाही. भाषणं करू दिलं नाही. अनेक नेत्यांची बैठका झाल्या. त्यात मला डावलण्यात आले. म्हणजे रामदास कदम यांना आयुष्यातून उठवून टाका, त्या त अनिल परब, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे यांना तुम्ही घेतलं. तुम्ही शिवसेनेला संपवत आहे. असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
Read also
- “मंगळसुत्र चोर, भुरटे, गुंडे विचार न करता हत्यार म्हणून वापरतांना दिसतात”; राष्ट्रवादीचा राणेंवर प्रहार
- रामराजें निंबाळकरांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम, सदैव राष्ट्रवादीसोबतच एकनिष्ठ
- “आपला राजकीय बळी जाणार, हे माहित असताना तातडीने मी पवार साहेबांना फोन लावला”; आव्हाडांनी सांगितला तो जुना किस्सा
- “शिंदे-फडणवीसांनी डावललं तर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सावरलं”
- “उद्धव ठाकरेंना मराठा समाज्याच्या नेत्यांना मोठं होऊ द्यायचं नाही”; रामदास कदमांचं ठाकरेंवर खळबळजनक आरोप