मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलिकडेच बाबासाहेब पुरंदरेंवर निशाणा साधला. आपल्या लिखाणातून छत्रपतींवर पुरंदरेंनी इतका अन्याय केला आहे की तो कुणी केला नसेल. त्यावर आता भाजपच्या नेत्यांनी शरद पवारांवर प्रखर शब्दात टिका केली आहे. आता यावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“काय ती जनहिताची उत्तरे, काय ती मुलाखत, एकदम ओक्के”; काॅंग्रेसने पुन्हा एकदा डिवचलं
निलेश राणे यांनी शरद पवारांवर टिका करताना एक ट्विट केला आहे. त्यात त्यांनी एक पत्र देखील जोडलं आहे. पवार साहेबांचं राजकारण किती खालच्या पातळीचं असू शकतं याचा धडधडीत पुरावा. १६ मे १९७४ रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचं कौतुक करणाऱ्या शरद पवारांना आज त्यांचं लिखाण चुकीचं वाटू लागलं आहे. ह्याच वृत्तीमुळे पवार साहेब बदनाम आहेत. असं त्यांनी त्यावर म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांकडून मोठं गिप्ट; सदस्य नोंदणीचे अर्ज अन् शपथपत्राचे मोठे गठ्ठे भेट
त्यावर विद्या चव्हाण म्हणाल्या की, आपली अक्कल किती? आपण बोलतो काय ? गुंडागिरी, दादागिरीचे बाळकडू. एकदा शिवचरित्र वाचा वस्तूस्थिती आणि पुरंदऱ्यांनी लेखणीतून केले आहे. उदात्तीकरण कोणाचे ? छत्रपतींची जडणघडण कशी झाली हे समजून घ्या.. त्यासाठी अभ्यास वृत्ती असणे आवश्यक असते. पण ती आपल्यात येणार कुठून? आडात नाही तर पोहऱ्यात. कोणीही काहीही बडबडाव कोल्हे कुई. पवार साहेबांचं व्यक्तिमत्व इतकं व्यापक, उत्तुंग की, प्रसिद्धी मिळणारच. मग ती कृप्रसिद्धी सुद्धा. मंगळसुत्र चोर, भुरटे, गुंडे विचार न करता हत्यार म्हणून वापरतांना दिसतात. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
“तुमच्या मनात बाळासाहेब ठाकरेंबाबत इतका पझेसिव्ह पणा का?” मनसेचा सवाल
दरम्यान, यासंदर्भात आज राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील फेसबुक पोस्ट केली आहे. आज दिवसभर समाज माध्यमांवर एक बातमी पसरते आहे कि, जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांनी एकटे का पाडले. आज जे मी कधीच कोणाला बोललो नाही. सांगितले नाही ते मी इथे लिहीत आहे. दुपारची वेळ होती आणि टिव्हीवरती ब. मो. पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण शासनाने जाहिर केला अशी बातमी आली. ती बातमी येताच मी माझ्या स्वत:च्या मनातले पाच प्रश्न हे ब. मो. पुरंदरे यांना टाकले. व त्याचे त्यांनी उत्तर द्यावे अशी मागणी केली. मी ब. मो. पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहीलेल्या कादंब-या याचा तसेच 2004 साली आलेल्या जेम्स लेनच्या पुस्तकाचा प्रचंड विरोधक आहे. ‘Hindu King In Islamic India’ ह्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मातोश्रींविषयी ज्या घाणेरड्या गोष्टी लिहीण्यात आल्या होत्या, त्या पहिल्यांदा महाराष्ट्रभर सांगणा-या काहीजणांपैकी मी एक होतो. त्यामुळे या पुस्तकांमधील त्या गोष्टी जेम्स लेनला कोणी सांगितल्या हे प्रश्न तेव्हाच उपस्थित झाले होते. ब. मो. पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण दिल्यानंतर हे प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आणि ते उपस्थित करणारा महाराष्ट्रातील पहिला राजकीय नेता अथवा इतिहासावर भाष्य करणारा मी होतो. असंही ते म्हटलं आहे.
पवार साहेबांचं राजकारण किती खालच्या पातळीचं असू शकतं याचा धडधडीत पुरावा. १६ मे १९७४ रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचं कौतुक करणाऱ्या शरद पवारांना आज त्यांचं लिखाण चुकीचं वाटू लागलं आहे. ह्याच वृत्तीमुळे पवार साहेब बदनाम आहेत. pic.twitter.com/abObhA8qUq
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 24, 2022
आपली अक्कल किती…? आपण बोलतो काय…? गुंडगिरी, दादागिरी चे बाळकडू…… एकदा “शिवचरित्र” वाचा वस्तुस्थिती आणि पुरंदर्यानी लेखणीतून केलेले…! उदात्तीकरण कोणाचे…? छत्रपतींची जडणघडण कशी झाली हे समजून घ्या…! त्यासाठी अभ्यास वृत्ती असणे आवश्यक असते!…1/2
— Vidya Chavan (@Vidyaspeaks) July 27, 2022
पण ती आपल्यात येणार कुठून…? आडात नाही तर पोहऱ्यात…! कोणीही काहीही “बडबडाव”! कोल्हे कुई sss…! पवार साहेबांचं व्यक्तिमत्व इतकं व्यापक, उत्तुंग की…! प्रसिद्धी मिळणारच.! मग ती “कृप्रसिद्धी” सुद्धा! मंगळसूत्र चोर, भुरटे, गुंडे विचार न करता हत्यार म्हणून वापरतांना दिसतात!…2/3
— Vidya Chavan (@Vidyaspeaks) July 27, 2022
Read also
- रामराजें निंबाळकरांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम, सदैव राष्ट्रवादीसोबतच एकनिष्ठ
- “आपला राजकीय बळी जाणार, हे माहित असताना तातडीने मी पवार साहेबांना फोन लावला”; आव्हाडांनी सांगितला तो जुना किस्सा
- “शिंदे-फडणवीसांनी डावललं तर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सावरलं”
- “उद्धव ठाकरेंना मराठा समाज्याच्या नेत्यांना मोठं होऊ द्यायचं नाही”; रामदास कदमांचं ठाकरेंवर खळबळजनक आरोप
- “काय ती जनहिताची उत्तरे, काय ती मुलाखत, एकदम ओक्के”; काॅंग्रेसने पुन्हा एकदा डिवचलं