मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजपने राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत. आज एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले असून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यानंतर आता राजभवनात जाऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे करणार आहेत. त्याआधीच राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत भाष्य केलं आहे.
काय ती झाडी, काय तो डोंगार? एकदम ओके सरकार; अमोल मिटकरींचा खोचक टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे यांचा मागील वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्य सरकारला माझं एकच सांगण आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे तुम्हीही नाही. असं म्हणत उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. ते आता प्रचंड व्हायरल होत आहे.
देवेंद्र फडणवीसांचं ‘असं’ असेल नवे मंत्रिमंडळ; नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देणार? त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं होतं. जवळपास 15 तासानंतर राज ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, एखादा माणूस ज्यादिवशी आपल्या नशीबालाच कर्तृत्व समजू लागतो. त्यादिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो. असं म्हणत राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.
“मला माझ्याच लोकांनी दगा दिला”; उद्धव ठाकरेंनी घेतले 10 ऐतिहासिक निर्णय
दरम्यान, एकनाथ शिंदे आज मुंबईत दाखल झाले असून त्यांच्यासाठी मोठी सुरक्षा पुरवण्यात आली आहे. विमानतळावरून देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यापर्यंत त्यांच्या ताफ्यात जवळपास 25 ते 30 गाड्यांचा ताफा आहे. कोणतीही अघटित घटना घडू नये म्हणून त्यांना केंद्र सरकारकडून झेड सुरक्षा पुरविण्यात आली आहे.
Read also
- फडणवीस मंत्रीमंडळ : राहुल कुल की महेश लांडगे.. कुणाला मिळणार संधी?
- इडीचे अधिकारी आता कुलुप आणायला गेलेत; राष्ट्रवादीचा भाजपवर हल्लाबोल
- २५ हजार कोटींची फाईल्स असेल तर मंजूर कशी करणार? अजित पवार कॅबिनेट मंत्र्यांवरच संतापले
- ..त्यादिवशी नक्कीच सत्याचा विजय होईल; रोहित पवारांचं सुचकं वक्तव्य
- “लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही”; रूपाली चाकणकरांचं ट्विट व्हायरल