मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने पेढेवाटून आनंद साजरा केला. तर काही ठिकाणी मध्यरात्री फटाके देखील फोडण्यात आले. मात्र एक सुसंस्कृत मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आणि त्यांचं नाव इतिहासात अजरामर राहिल, अशा प्रतिक्रिया देखील समाजमाध्यामांवर उमटल्या. आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे.
पुणे शहराचं नाव जिजाऊनगर करा; कॅबिनेट मंत्रिमंडळात काॅंग्रेसची मोठी मागणी
रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो ट्विट केलं आहे. येणाऱ्या काळात ज्या दिवशी जनतेकडून कौल घेतला जाईल त्यादिवशी नक्कीच सत्याचा विजय होईल, हा विश्वास आहे, असं म्हटलं आहे. आज मुख्यमंत्र्यांनी लोकांशी संवाद साधून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. एक सरळ, चांगला, लोकांची काळजी घेणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला होता. आज त्यांनी पायउतार होताना घटक पक्षांचे आणि सर्वांचेच आभार मानले. कोरोना काळात एक मुख्यमंत्री किती चांगले काम करु शकतो, याचा आदर्श उद्धव ठाकरे यांनी देशासमोर ठेवला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या दीर्घकाळ लक्षात राहतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी देखील व्यक्त केला.
“शरद पवारांनी ज्या माणसांना जवळ घेतलं, त्यांना काखेत दाबून मारलं”
उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपदाचे ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जात आहे. अशातच आता समाजमाध्यांमवर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडाळाची संभाव्य यादी देखील प्रकाशित होत आहेत. याबाबत भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
“संजय राऊतांना योग्यवेळी चुना लावू”; गुलाबराव पाटलांचा कडक इशारा
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या संदर्भात आज एकनाथ शिंदे मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत इतर काही आमदार देखील देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार ते आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- “लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही”; रूपाली चाकणकरांचं ट्विट व्हायरल
- काय ती झाडी, काय तो डोंगार? एकदम ओके सरकार; अमोल मिटकरींचा खोचक टोला
- देवेंद्र फडणवीसांचं ‘असं’ असेल नवे मंत्रिमंडळ; नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी
- “मला माझ्याच लोकांनी दगा दिला”; उद्धव ठाकरेंनी घेतले 10 ऐतिहासिक निर्णय
- उद्धव ठाकरेंचा शेवटचा मास्टरस्ट्रोक; अखेर औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’