मुंबई : राज्यपालांच्या आदेशानंतर उद्धव ठाकरे यांना उद्या बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. त्याआधी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत पुणे शहराचे नाव जिजाऊनगर करा अशी मागणी केली आहे. तसेच औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाचे नाव बदलण्यात यावे अशी देखील मागणी केली आहे.
जादूटोणा केलायं म्हणून दर्शनासाठी जातोय; कामाख्या देवीच्या दर्शनावेळी बच्चू कडूंचा उपरोधित टोला
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव तर शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक रोडला बॅरिस्टर अंतुलेंचं नाव देण्याची मागणी देखील या बैठकीत काॅंग्रेसने केली आहे. त्यामुळे आता ही बैठक नामांतराच्या मुद्दावरून गाजणार का? याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. त्याआधी राजीनाम्याची ‘ स्क्रीप्ट ‘ठरली. संभाजी नगरच्या नामांतराचा ‘आव आणायचा आणि आपले ‘हिरवे प्रेम हेच खरे हिंदुत्व हे सिद्ध करायचे.. कुठे आणून ठेवलीये मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना? असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला होता.
गोव्यात भाजपचा शिजतोय मेगाप्लॉन; बंडखोर अन् भाजपचे आमदार आज गोव्यात दाखल होणार?
मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना अचानक काॅंग्रेसचे दोन मंत्री बाहेर पडले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख हे मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर आले होते. त्यामुळे नामांतराचे प्रस्ताव मांडण्यात आल्याने काॅंग्रेस नाराज झाली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. तर बहुमत चाचणी वरून सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे.
बंडखोर आमदारांचा आसाममध्ये मास्टरस्टोक; महाराष्ट्रात येण्यापुर्वी आसामबाबत घेतला ‘हा’ निर्णय
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची याचिका अद्याप प्रलंबित आहे. तसेच शिवसेनेच्या 16 बंडखोरांबाबाचा निर्णयही 11 तारखेला प्रलंबित आहे. 11 जुलैनंतर विश्वासदर्शक ठरावावर मतदान व्हावे असा युक्तिवाद ठाकरे सरकारकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे. तसेच बहुमत चाचणीसाठी इतकी घाई का केली जात आहे. असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
Read also
- “शरद पवारांनी ज्या माणसांना जवळ घेतलं, त्यांना काखेत दाबून मारलं”
- “संजय राऊतांना योग्यवेळी चुना लावू”; गुलाबराव पाटलांचा कडक इशारा
- सुखात असो की दु:खात आम्ही शिवसेनेच्या पाठिशी राहणार
- कुठे आणुन ठेवलीय बाळासाहेबांची शिवसेना? राजकीय नाट्यमय घडामोडींवर मनसेचा सवाल
- “शिंदेसाहेब शिवसेना हरता कामा नये”; दिपाली सय्यद यांचा सुर बदलला