मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारण मोठा भुंकप आला आहे. या भुकंपचा केंद्रबिंदु आता सुरतवरून गुवाहाटीला असल्याचं समजत आहे. ते आता गोव्याच्या दिशेने जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. कारण आता भाजपचे काही आमदार गोव्यात दाखल होत असून बंडखोर आमदारांना देखील गोव्यात आणलं जाणार आहे. तेथेच बंडखोर आमदार आणि भाजपचे आमदार सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपच्या आमदारांची विमानाची तिकिटे आणि नियोजनाची जबाबदारी राणे, लांडगे आणि कुल यांच्याकडे देण्यात आली आहे.
” जे आरोप करीत आहेत, ते अगोदर राष्ट्रवादीमध्येच होते”; सुप्रिया सुळेंचा बंडखोर आमदारांवर निशाणा
त्यामुळे भाजपच्या आमदारांना घेऊन आज महेश लांडगे गोव्यात दाखल होणार असून त्यांचा पुणे ते गोव्यात असा विमानाचे तिकीट देखील समाजमाध्यांमवर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे प्रथमच पिंपरी चिंचवड ला मंत्रिपद मिळणार का? याची चर्चा सध्या पिंपरी चिंचवडच्या परिसरात सुरू झाली आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उतरलेले असताना भाजपकडून आता मोठ्या हालचाली सुरू केल्या जात आहेत. बंडखोर आमदारांनी मागेच महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेत असल्याचं पत्र राज्यापालांना पाठवलं होतं. त्यामुळे सरकार आता अल्पमतात आलं असून राज्य सरकारने 30 तारखेपर्यंत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपालांनी आता म्हटलं आहे. त्याची आता जोरदार तयारी सुरू केली जात आहे.
“भूल थापांना बळी पडू नका, आजही तुमची काळजी वाटते, मुंबईत या” उद्धव ठाकरे
तसेच काल देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय अस्थिततेबाबत राज्यपालांना पत्र पाठवले असून त्यावर राज्य सरकारला बहुमत चाचणी करण्याचे तात्काळ आदेश दिले आहेत. एकनाथ शिंदे गटाचे आमदार हे गोव्यामध्ये ‘ताज कनेक्शन’ या हॉटेलमध्ये थांबतील. त्याठिकाणी 71 रुम बुक करण्यात आलेल्या आहेत आणि खाजगी विमानाने ते सर्व आमदार 4.30 वाजताच्या दरम्यान गोव्यात पोहोचतील.
राज्याच्या सत्तानाट्यात टर्निंग पॉईंट, भाजपने राज्यपालांना दिले ‘हे’ पत्र
दरम्यान, शिंदे यांच्या गटात आता 50 पेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे हा दावा खरा ठरला आणि भाजप आणि शिंदे गटाने राजभवनात संख्याबळ दाखवलं तर महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार आहे. त्यामुळे सुत्रांच्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्री देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read als
- बंडखोर आमदारांचा आसाममध्ये मास्टरस्टोक; महाराष्ट्रात येण्यापुर्वी आसामबाबत घेतला ‘हा’ निर्णय
- गोव्यामध्ये ‘ताज कनेक्शन’; बंडखोर आमदारांना गुवाहाटीहून गोव्याला नेण्यासाठी स्पाईंसजेटचे विमान रवाना
- आमदारांनो उद्या सकाळपर्यंत मुंबईत या..! भाजपच्या सर्व आमदारांना वरिष्ठांकडून फोन
- “एका बाजुला डुकरं, रेडा, कुत्रा, नाल्याची घाण म्हणायचं अन् दुसऱ्या बाजूला समेटची हाक द्यायची”
- “राजकीय अस्थिरता असताना सरकारने एकाच वेळी 160 जीआर काढले”; भाजपचं राज्यपालांना पत्र