मुंबई : बंडखोर आमदार मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भावनिक आवाहान साद घालतील, असं चित्र सध्या दिसत नाही. कारण उद्धव ठाकरे एका बाजूला समेटाची हाक देतात आणि दुसऱ्या बाजूला खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे वेगवेगळ्या उपमा देऊन आमच्यावर आरोप करताहेत. असा सवाल बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. तसेच काल देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय अस्थिततेबाबत राज्यपालांना पत्र पाठवले असून त्यावर राज्य सरकारला बहुमत चाचणी करण्याचे तात्काळ आदेश दिले आहेत. एकनाथ शिंदे गटाचे आमदार हे गोव्यामध्ये ताज कन्वेंशन’ या हॉटेलमध्ये थांबतील. त्याठिकाणी 71 रुम बुक करण्यात आलेल्या आहेत आणि खाजगी विमानाने ते सर्व आमदार 4.30 वाजताच्या दरम्यान गोव्यात पोहोचतील.
राज्याच्या सत्तानाट्यात टर्निंग पॉईंट, भाजपने राज्यपालांना दिले ‘हे’ पत्र
शिवसेनेकडून बहुमत चाचणी आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनी प्रभू यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांना त्यांच्या याचिकेची प्रत न्यायालयासह सर्व पक्षकारांना दुपारी 3 वाजेपर्यंत देण्यास सांगितले. सायंकाळी 5 वाजता सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेची याचिका तातडीने आजच सुनावणी करण्यास होणार दिला. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या सर्व आमदारांना गुवाहाटीहून गोव्याला नेण्यासाठी स्पाईंसजेटचे विमान हे गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाले आहे. यापुर्वी स्पाईसजेटच्याच विशेष चार्टर विमानाने या आमदारांना सुरतहुन गुवाहाटी येथे नेण्यात आले होते. त्यामुळे गुवाहाटी विमानतळावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यातत आलेला आहे.
राजकीय गोंधळातही उद्धव ठाकरेंचा नवी मुंबई विमानतळाबाबत मोठा निर्णय
एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, ठिक आहे, मी आजपासून बोलायचं थांबतो. पण मी पक्षाची भूमिका आणि शिवसैनिक म्हणून कडवटपणे बोलत आहे. महाराष्ट्राचे तुकडे करण्याची योजना आहे. त्याविरोधात बोलत आहे. आता याचा त्यांना त्रास होत असेल तर ठिक आहे. एकनाथ शिंदे हे माझे निकटचे सहकारी आहेत. मित्र आहेत. मी काय आहे. हे त्यांना माहिती आहे आणि मी ते काय आहेत. हे मला माहिती आहे. असंही ते म्हणाले.
एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंचा झटका! ठाण्याच्या माजी महापौरांची शिवसेनेतून हाकालपट्टी
दरम्यान, आदित्य ठाकरे आमच्यावर टिका करतात, असे म्हणून चालणार नाही. हे चुकीचं आहे. आदित्य ठाकरे हे पक्षाचे नेते आहेत. शिवसैनिकांचा उद्रेक झाला आहे. आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत बोलणारच. बहुमत चाचणीच्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टोत आव्हान देणार आहोत. 16 आमदारांना अपात्र करण्यासंदर्भातील विषय सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना बहुमत चाचणी घेणे बेकायदेशीय आहे. याविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहोत. राज्यपालांनी जे विशेष अधिवेशन बोलावले आहेत. ते कायद्याला धरून नाही. अनिल परब, अनिल देसाई आणि अरविंद सावंत आमची कायदेशीर बाजू संभाळत आहेत. उद्या बंडखोर आमदारांना मुंबईत येऊ दे, मग बघू असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Read als
- आमदारांनो उद्या सकाळपर्यंत मुंबईत या..! भाजपच्या सर्व आमदारांना वरिष्ठांकडून फोन
- “एका बाजुला डुकरं, रेडा, कुत्रा, नाल्याची घाण म्हणायचं अन् दुसऱ्या बाजूला समेटची हाक द्यायची”
- “राजकीय अस्थिरता असताना सरकारने एकाच वेळी 160 जीआर काढले”; भाजपचं राज्यपालांना पत्र
- ” जे आरोप करीत आहेत, ते अगोदर राष्ट्रवादीमध्येच होते”; सुप्रिया सुळेंचा बंडखोर आमदारांवर निशाणा
- “भूल थापांना बळी पडू नका, आजही तुमची काळजी वाटते, मुंबईत या” उद्धव ठाकरे