मुंबई : बंडखोर आमदारांकडील असलेली सर्व खाती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढून घेतली. त्यानंतर पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ठाण्याच्या माजी महापौर आणि एकनाश शिंदे समर्थक मिनाक्षी शिंदे यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली. त्याचबरोबर आता एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या प्रस्तावाला नाकरत उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.
“कारकुनच्या पदावरून उचलून राजसाहेबांनी सामानाचा संपादक बनवला”; मनसेचा राऊतांना टोला
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी हे विमानतळ बांधलं जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव या विमानतळाला देण्यात यावं, असा प्रस्ताव राज्य सरकारकडून देण्यात आला होता. मात्र नवी मुंबई विमानतळाला दिंवगत दि.बा. पाटलांचं नाव देण्यात यावं. अशी मागणी तेथील स्थानिकांकडून कऱण्यात येत होती. त्यानंतर विमानतळ प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक सर्व समाजातील लोकांना मातोश्रीवर बोलावून त्यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्याला होकार दिल्याचं समजत आहे.
“मनसे हा पक्ष नसून डिपॉझिट जप्तची मशिन”; दिपाली सय्यद यांनी मनसेला पुन्हा डिवचलं
नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं. असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी सिडकोला पत्र लिहून पाठवलं होतं. मात्र याला तेथील स्थानिकांनी प्रचंड विरोध दर्शविला होता. त्यानंतरच दि.बा. च्या कार्यामुळे आणि भूमिपुत्रांच्या आग्रहास्तव नाव देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा मुद्दा आता निकाली निघणार का? याकडे सगळयाचं लक्ष राहिल आहे.
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं; बंडखोर आमदार दिपक केसरकर
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर मंत्र्यांची खाती काढून घेण्यात आली असून, त्यांनी गेल्या महिन्याभरात घेतलेल्या निर्णयांच्या सर्व फायली ताब्यात घेण्याची प्रक्रिया मुख्यमंत्री कार्यालयाने सुरू केली आहे. त्यातून काही मंत्र्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. काल मुंबई उच्च न्यायालयात एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांविरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका ही ॲड.असीम सरोदे यांच्या मदतीने 7 नागरिकांनी दाखल केली आहे.
Read als
- एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंचा झटका! ठाण्याच्या माजी महापौरांची शिवसेनेतून हाकालपट्टी
- “लवकर निर्णय घ्या”; बंडखोर आमदारांचं मुख्यमंत्र्यांना शेवटचं आज अल्टिमेटम
- ‘शिंदे साहेब सोडून जाऊ नका, आम्ही उद्धव साहेबांना समजावून सांगतो’
- “महाराष्ट्रातील १४४ चा आकडा गाठण्यासाठी भाजपाने आसाममध्ये १२६ जणांकडे दुर्लक्ष केले”
- “बेडकाच्या डबक्यात भाजपने उतरू नये, नाहीतर फडणवीस, मोदींची अप्रतिष्ठा होईल”