मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडात आता शिवसेनेचे 39 आमदार सहभागी झाले आहेत. तसेच राज्यातील काही शिवसेनेचे कार्यकर्ते देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले जात आहे. यामध्ये खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे, आणि गिते हे बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधत आहेत. त्यावरून आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
आता तर विठ्ठलाची महापुजा ‘उद्धव ठाकरेचं’ करणार; SC च्या निकालानंतर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया
संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात एक ट्विट केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, दुसऱ्यांना रिक्षावाला, पानटपरीवाला, भाजी विकणारा, वॉचमन, म्हणण्याऱ्या लोकांनी हे विसरू नये ते स्वत: लोकप्रभामध्ये कारकून होते. तेथून उचलून राजसाहेबांनी तुम्हाला सामनाचे संपादक बनवलं असा टोला संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना लगावला आहे. यावर आता संजय राऊत काय प्रतिक्रिया देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
बंडखोर आमदारांना केंद्र अन् राज्याने सुरक्षा द्यावी; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
बंडखोर आमदार शहाजी पाटील यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून त्यावर संजय राऊतांनी खोचक टिप्पणी केली आहे. एक आमदार म्हणला काय झाडी, काय हाटील, काय डोंगर, काय पाणी, मग महाराष्ट्रात स्मशान आहे का? तिथे झाडी, फुलं निसर्ग, दगडं, पाणी आहे, मग तुमच्या महाराष्ट्रात काय आहे. असं म्हणत संजय राऊतांनी शहाजी पाटलांवर संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर बाळासाहेबांचे भक्त पाठीत खंजीर खुपसत नाहीत. असंही म्हणत त्यांनी बंडखोर आमदारांना सुनावलं आहे.
“आम्ही संपणार नाही, थांबणार नाही, माघार घेणार नाही”; बंडखोर आमदारांची भूमिका
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आज सहावा दिवस असून अजूनही ते गुवाहाटीत आहेत. मात्र आता भाजपकडून देखील हालचाली सुरू केल्या असून सोमवारी भाजपचे आमदार आणि बंडखोर आमदार गोव्यात येण्याची शक्यता आहे. कोरोनाची लागण झाल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सिंह यांच्याकडून गोव्याच्या राज्यपालांकडे राज्याचा प्रभारी कारभार सोपवला आहे. त्यामुळे भाजप आणि बंडखोर आमदार गोव्यातच सत्तास्थापनेचा दावा करू शकतात.
Read also:
- “मनसे हा पक्ष नसून डिपॉझिट जप्तची मशिन”; दिपाली सय्यद यांनी मनसेला पुन्हा डिवचलं
- “एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं; बंडखोर आमदार दिपक केसरकर
- “राज्य सरकारचा पाठिंबा कोर्टात नाही तर राज्यपालांकडे जाऊन सांगायचा असतो”; जयत पाटलांचा शिंदेंना टोला
- “राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावुन आलं पाहिजे”; रूपाली पाटील
- “बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा अन् धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय”;