मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीकरून जवळपास एक आठवडा उलटला आहे. तरी देखील बंडखोर आमदारांनी आपली सत्ता स्थापन करण्याची कोणतीही भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही. यावरून आता मनसे आणि शिवसेनेत मोठा खडाजंगी बघायला मिळत आहेत. मातोश्रीच्या जाचाला कंटाळून राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, अशा प्रतिक्रिया आता मनसेच्या नेत्यांकडून दिल्या जात आहे. त्यावर आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
बंडखोर आमदारांना केंद्र अन् राज्याने सुरक्षा द्यावी; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
मातोश्रीच्या जाचाला किंवा राजकारणाला कंटाळून बंडखोरी केली असे कारण सांगणारे राजसाहेब आता 11 वरून 1 वर आले आहेत. शिंदे साहेब शिवसेनेचे राजकीय गणित नेहमी अधिक असते वजा नाही. त्यामुळे राजकीय सल्ले घेताना हिशोब बघून घ्या, असा सल्ला देत मनसे हा पक्ष नसून डिपॉझिट जप्तची मशिन आहे. अशी खोचक टिप्पणी देखील दिपाली सय्यद यांनी मनसेवर केली आहे.
“आम्ही संपणार नाही, थांबणार नाही, माघार घेणार नाही”; बंडखोर आमदारांची भूमिका
दिपाली सय्यद आणि मनसेच्या नेत्या शालीनी ठाकरे यांच्या नेहमी राजकारणांवरून टिका टिप्पणी केली जाते. स्वत: च्या पक्षात केमिकल लोच्या कधी झाला, हे कलानगरच्या सर्किटला समजलेच नाही. असं म्हणत मनसेच्या नेत्या शालीनी ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. तर जे आम्हाला सोडून गेले, ते आमच्यासाठी मेले. असे ठणकावणाऱ्या आमच्या साहेबांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. नाहीतर हे. एकिकडे सैनिक रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे पक्षप्रमुखांसहीत संपुर्ण परिवार गुपचुप बंडखोरांच्या मनधरणीचे सर्व प्रयत्न करत आहेत. असं मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं होतं.
राजकीय हस्तक्षेप झालेल्या मतदार याद्या बदला, अन्यथा..; विधान परिषद आमदार उमा खापरेंचा इशारा
दरम्यान, बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे शिंदे गटाला 11 जुलै पर्यंत दिलासा मिळाला आहे. त्यामुळे एकीकडे भाजपने देखील सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतून पाठिंबा काढून घेत असल्याचा पत्र देखील आता बंडखोर आमदारांकडून राज्यापालांना देण्याची शक्यता आहे.
Read also:
- “एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं; बंडखोर आमदार दिपक केसरकर
- “राज्य सरकारचा पाठिंबा कोर्टात नाही तर राज्यपालांकडे जाऊन सांगायचा असतो”; जयत पाटलांचा शिंदेंना टोला
- “राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावुन आलं पाहिजे”; रूपाली पाटील
- “बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा अन् धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय”;
- आता तर विठ्ठलाची महापुजा ‘उद्धव ठाकरेचं’ करणार; SC च्या निकालानंतर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया